Shreya Maskar
दौलताबाद किल्ला 'देवगिरी' म्हणूनही ओळखले जातो. दौलताबाद किल्ला छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) शहरापासून वायव्येस सुमारे १६ किलोमीटर अंतरावर, दौलताबाद गावात स्थित आहे.
दौलताबाद किल्ला इ.स. ११८७ मध्ये सेउना (यादव) घराण्याचा पहिला राजा 'भिल्लम पाचवा' याने बांधला होता. जरी याची स्थापना १२ व्या शतकात झाली.
बांधकाम करणाऱ्यांनी नैसर्गिक टेकडीचा भाग १५० फुटांपर्यंत सरळ खाली कापला. यामुळे खडकाची एक गुळगुळीत भिंत तयार झाली, जिच्यावरून शत्रू वर चढू शकत नसे.
किल्ल्याच्या पायथ्याशी खडकात कोरलेला एक खोल खंदक होता. त्यात पाणी आणि मगरी सोडल्या जात असत आणि पलीकडे जाण्यासाठी केवळ एक अरुंद, हलवता येण्याजोगा पूल होता.
खडकाच्या आत 'अंधेरी' नावाची एक गुंतागुंतीची आणि पूर्णपणे अंधारी बोगद्याची रचना केली होती, ज्यात अनेक दिशाभूल करणारे मार्ग होते. यात घुसलेले शत्रू रस्ता चुकत, सापळ्यात अडकत किंवा शेवटी एका तापलेल्या लोखंडी पत्र्याचा सामना करत.
हा किल्ला कधीही उघड आक्रमणाद्वारे किंवा बळाचा वापर करून जिंकता आला नाही. जेव्हा शत्रूंनी हा किल्ला जिंकला, तेव्हा त्यांना तेथील रहिवाशांना उपासमारी, लाचखोरीचा आधार घ्यावा लागला.
दौलताबाद महाराष्ट्रातील २०० मीटर उंच अशा शंकूच्या आकाराच्या टेकडीवर वसलेले आहे. पावसाळ्यात या ठिकाणी नक्की जा.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.