Uddhav Thackeray speech highlights Saam TV News
महाराष्ट्र

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Uddhav Thackerays Powerful Speech Points: मराठी विजयी सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका करत ‘एकत्र आलो, एकत्र राहण्यासाठी’ असे विधान करत युतीचे संकेत दिले. भाषणातील १० मुद्द्यांवर राज्याचे लक्ष.

Bhagyashree Kamble

त्रिभाषा सक्तीचा निर्णय फडणवीस सरकारने मागे घेतल्यानंतर ठाकरे बंधूंनी विजयी सोहळ्याचं आयोजन केलं होतं. या सोहळ्यामध्ये राज्यातील कानाकोऱ्यातून मराठी सैनिक आले होते. सुरूवातीला मनसे प्रमुख राज ठाकरेंनी उपस्थित जनतेला संबोधित केलं. नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित जनतेला संबोधित करत थेट युतीचे संकेत दिले आहेत. 'एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी' असे विधान करताच उपस्थितांनी 'जय महाराष्ट्र' अशी घोषणा केली. दरम्यान, आजचे उद्धव ठाकरेंचे ६ गाजलेले मुद्दे कोणते? पाहुयात.

उद्धव ठाकरेंचे ६ गाजलेले मुद्दे

१. आज आमच्या भाषणांपेक्षा दोघांचं एकत्र दिसणं गरजेचं. आमच्या दोघांमधील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केलाय. आता अक्षता टाकण्याची तुमच्याकडून अपेक्षा नाही. एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी..

२. भाजप ही खरंतर अफवांची फॅक्टरी आहे. मागील काळात त्यांनी उद्धव ठाकरेंनी हिंदूत्व सोडलंय असं उठवलं. खरंतर हिंदुत्व कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही. आम्ही मराठी बोलणारे, तुमच्याहून जास्त कडवट कट्टर आहोत. मराठी माणूस महाराष्ट्रात न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला तुम्ही गुंड म्हणत असाल तर, आम्ही गुंड आहोत.

३. मी मुख्यमंत्री असताना मराठीची सक्ती होती आणि याचा मला अभिमान आहे. यानंतर काहीजण कोर्टात गेले, ही गुंडगिरी नाही? तो भेडिया का कोण? ही त्यांची पिलावळ आहेत. ते म्हणतात शिवसेनेनं आजवर काय केलं? मराठी माणूस आम्ही मुंबईबाहेर नेलं. मराठी माणूस जर मुंबईबाहेर नेला असं तुम्हाला वाटत असेल तर, तुम्ही मुंबई अन् महाराष्ट्राचे लचके तोडले, त्याचं काय? उद्योग, व्यवसाय पळवले त्याचं काय?

४. आपली ताकद ही एकजुटीची असायला हवी. संकट आले की आपण सगळे एकत्र येतो. संकट गेल्यावर आपापसात भांडायला लागतो. असा नतद्रष्टपणा आता करायचा नाही.

५. वृत्तपत्रात बातमी वाचली की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद झालं आहे. नव्यानं नोंदणी होणार नाही, आता बसा बोंबलत. त्यापेक्षाही भयानक गोष्ट म्हणजे, संपूर्ण भारतात कर्जबाजारी शेतकऱ्यांची संख्या जास्त महाराष्ट्रात आहे.

६. एक गद्दार काल म्हणाला, जय गुजरात.. किती लाचारी करायची? पुष्पामध्ये नायक म्हणतो, झुकेगा नही साला, तसे हे गद्दार म्हणातात, उठेगा नही साला. आता त्यांच्यात उठण्यासारखं आहेच काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT