महापुरातील नुकसान भरपाई मिळावी यासाठी शिरोळ मध्ये मोर्चा! Saam Tv
महाराष्ट्र

महापुरातील नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी शिरोळ मध्ये मोर्चा!

महापुरात अनेकांचे संसार वाहून गेले आहेत तर व्यवसाय कोलमडले आहेत. शेतीचे कधीही न भरून येणारे नुकसान झालं आहे, त्यामुळे शासनाने या पूरग्रस्तांच्या मागण्यांचा विचार करणं गरजेचं आहे अशी एकंदरीत सर्व आंदोलनकर्त्यांची इच्छाआहे.

संभाजी थोरात, कोल्हापूर

गेल्या पंधरा वर्षात पश्चिम महाराष्ट्राला तीन महापुराना सामोरे जावे लागलं. या तीनही पुरात कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याच मोठं नुकसान झालं. या नुकसानीची भरपाई समाधानकारक न मिळाल्याने नागरिक आक्रमक झाले असून आता रस्त्यावर उतरले आहेत.Morcha in Shirol to seek compensation for floods

नुकत्याच येऊन गेलेल्या महापूरामुळे अर्ध्या महाराष्ट्रामध्ये हाहाकार माजला होता तळीये मध्ये दरडी पडून आख्ख गावं होत्याच नव्हतं झालं. तर चिपळूनChiplun मध्ये संपुर्ण शहरात पाणी घुसल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक निकसान झालं या बरोबर सगळ्यात जास्त नुकसानLoss झालं ते पश्चिम महाराष्ट्राचWestern Maharashtra आणि सलग तीनवेळा आलेल्या महापूरामुळे कृष्णाकाठच्या लोकांना सावरायला वेळही मिळाला नाही अशात शासनाची नदत म्हणजे तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार या सर्व त्रासाला कंटाळून आता कोल्हापूरKolhapur मधाल शिरोळ तालुक्यातील नागरिक आता रस्त्यावरती उतरले आहेत.

महापुरात राज्यातील अनेक तालुक्याच नुकसान केलं त्यातील शेतीच सर्वांत जास्त नुकसान शिरोळ तालुक्यात झालंय. तालुक्यातील 42 गावं बाधित होतात. येथील हजारो हेक्टर ऊस शेती उध्वस्त झाली त्यामुळे येथील नागरिक अडचणीत आलेत. या पूरग्रस्तांना मदत देताना शासनाच्या अटी आणि नियमांमुळे काहीच मिळत नाही. त्यामुळे पूरग्रस्तांच्या पदरी काहीच पडत नाही. त्यामुळे ऊसाला सरसकट 2 हजार रुपये गुंठा मदत द्यावी, शेतीपूरक व्यवसायाचे पंचनामे करून मदत दयावी, पुढील दोन महिने जनावरांना चारा शासनाकडून मिळावा, मृत जनावरांसाठी 40 हजार रुपये मिळावे, भूमीहीन शेतकऱ्यांना 5 लाख बिनव्याजी कर्जInterest free loan मिळावे यासह अनेक मागण्यांसाठी आज शिरोळ मध्ये मोर्चा काढण्यात आला होता.

महापुरात अनेक कुटुंबांचे संसार वाहून गेले आहेत तर व्यवसायBusiness ही कोलमडले असून. शेतीच कधीही न भरून येणारे नुकसान झालं आहे, त्यामुळे शासनाने या पूरग्रस्तांच्या मागण्यांचा विचार करणं गरजेचं आहे अशी एकंदरीत सर्व आंदोलनकर्त्यांची इच्छाआहे.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Juices For Glowing Skin: चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी कोणते ज्यूस प्यावे?

Maharashtra Live News Update: पुण्यात भैरोबा नाला येथील दोन घरांना आग,सुदैवाने मोठा अनर्थ टळला

Dahi Bhindi Recipe : ऑफिसमधून आल्यावर फक्त १० मिनिटांत बनवा दही भेंडी, रेस्टॉरंटसारखी चव येईल घरच्या जेवणाला

सर्वात मोठी बातमी! 42 आमदारांवर कारवाई होणार? उच्च न्यायालयानं बजावली नोटीस, राजकीय वर्तुळात खळबळ

Baby Teeth Cleaning Tips: बाळाचे दात घासायला कधी सुरू करावे?

SCROLL FOR NEXT