Aghori Puja at Raigad Fort  saam tv
महाराष्ट्र

Bharat Gogawale Aghori Puja: 'अघोरी'वरून पेटलेलं राजकारण नवस फेडण्यापर्यंत पोहोचलं; महायुतीच्या नेत्यांमध्येच शाब्दिक राडा

Aghori Puja at Raigad Fort : रायगडावर अघोरी पूजा बांधल्याच्या आरोपाने राज्यात एकच खळबळ उडालीय. मंत्री भरत गोगावले यांनी राज्यभिषेकच्या दिवशी नवस फेडल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केलाय.

Bharat Jadhav

छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडमध्ये अघोरी पूजा बांधल्याचा आरोप केला जातोय. रायगडावर मंत्री भरत गोगावले यांनी अघोरी पूजा केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी केलाय. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी सुद्धा भरत गोगावलेंवर अघोरी पूजा केल्याचा आरोप केलाय. दरम्यान अघोरी पूजा आता नवस फेडण्यापर्यंत पोहोचलीय.

राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांच्या आरोपांवर शिवसेनेचे नेते भरतशेठ गोगावले यांनी उत्तर दिलंय. रायगडवर भरत गोगावले यांनी अघोरी पूजा बांधली असल्याचा आरोप होतोय. यावरून महायुतीमधील नेत्यांमध्ये शाब्दिक राडा सुरू झालाय. त्यामुळे अघोरी विद्यावरून महायुतीचा तिढा जाणार असल्याची शक्यता आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी मंत्री भरत गोगावले यांनी अघोरी पूजा केल्याचा आरोप केलाय. सूरज चव्हाण यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दोन व्हिडिओ पोस्ट करत मंत्री गोगावलेंवर आरोप केलाय. व्हिडिओमध्ये गोगावले हे पूजा करताना दिसत आहेत. ही पूजा कशाची, ती कशासाठी करण्यात आली, याविषयीची माहिती समोर आली नाहीये, पण ही अघोरी पूजा असल्याचा दावा सूरज चव्हाण यांनी केलाय.

तर अघोरी करून आधीच पालकमंत्री झालो असतो

सूरज चव्हाण यांच्या या आरोपांवर शिवसेना नेते भरतशेठ गोगावले यांनी उत्तर दिलंय. अघोरी, बिगारी आम्ही जाणत नाही. साधू- महात्मे भेटायला येतात, त्यांना आम्ही भेटतो. अघोरी काय करायचं असते तर कधीच पालकमंत्री झालो असतो. राष्ट्रवादी कडे मुद्दे नाहीत म्हणून ते शोधाशोध करीत आहेत, असं गोगावले म्हणालेत.

अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनीही चव्हाण यांना सुनावलंय. सेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरेंवर घणाघाती आरोप केलाय. अघोरी विद्या तटकरेंची संस्कृती आहे. सुरज चव्हाण तटकरे यांनी पाळलेले प्रवक्ते आहेत. ते काही मनाला येईल ते बोलतात. त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल, असं दळवी म्हणालेत.

रायगडावर नवसाचं अघोरी कृत्य

रायगडावर नवसाचा अघोरी कृत्य करण्यात आल्याचा दावा संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी केलाय. निवडून येण्यासाठी रायगडच्या भरत गोगावले यांनी नुसती अघोरी पूजा घातली नाही तर त्यांनी मंत्रीपद मिळण्यासाठी शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी ‘नवस’ सुद्धा बोलला आणि तो फेडला, असा आरोप संभाजी ब्रिगे़डने केलाय. महाराष्ट्रात रायगडाचे पावित्र्य राखले जात नसेल त्या सरकार आणि मंत्र्यांकडून काय अपेक्षा करायची, दुर्दैवी आहे आणि निषेधार्ह आहे, अशी प्रतिक्रिया संतोष शिंदे यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Cleaning Tips: सिलिंडरच्या गंजाने किचनची टाइल्स खराब झालीये? 'या' सोप्या पद्धतीने काढा डाग

Food Adulteration: तुमच्या ताटातील पनीरमध्ये कोण विष टाकतंय? भाजप आमदाराचा मोठा गौप्यस्फोट|VIDEO

Chanakya Niti : 2025 मध्ये यश,पैसा फ्रीडम पाहिजे? मग या ५ सवयी आत्ताच सोडा

Maharashtra Live News Update: धुळ्यात एमआयएमला मोठा धक्का

Uttarakhand: उत्तराखंडमध्ये भीषण अपघात, भाविकांना घेऊन जाणारी जीप ३०० फूट खोल दरीत कोसळली, ८ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT