गिरीश कांबळे
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाबाबत महाविकास आघाडीत अद्यापही चर्चा सुरु आहे. अनेक जागांवरचा तिढा अद्यापही कायम आहे. अशात उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान मातोश्रीवर ठाकरे गटाच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी आक्रमक भूमिका मांडल्याची माहिती समोर येत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मातोश्री येथे काल विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यामध्ये भास्कर जाधव आक्रमक झालेले पाहायला मिळाले. रामटेक आणि गडचिरोली जागा आपण लढली पाहिजे, असं भास्कर जाधव आणि स्थानिक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव ठेवला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. (Latest Marathi News)
विदर्भात जास्त जागा काँग्रेसकडे न जाता आपण देखील तिथे लढलं पाहिजे, अशी भूमिका भास्कर जाधव यांनी मांडली. विदर्भात वाढण्यासाठी काँग्रेस आपला वापर करतंय का? असा देखील सवाल भास्कर जाधव यांनी बैठकीत उपस्थित केला.
विदर्भात आपली ताकद वाढवण्यासाठी आपण लोकसभेच्या जागा लढल्या पाहिजेत, अशी भूमिका भास्कर जाधव यांनी बैठकीत मांडली. तसेच आपण अधिक जागा लढलो तर कसे निवडून येऊ हे देखील गणित भास्कर जाधव यांनी बैठकीत मांडलं. लोकसभा निवडणुकीसाठी विभागनिहाय नेत्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. विदर्भातील जबाबदारी भास्कर जाधव यांच्याकडे देण्यात आली आहे.
रामटेक याठिकाणी सध्या शिवसेना शिंदे गटाचे कृपाल तुमाने खासदार आहेत. त्यामुळे तसा हा मतदारसंघ शिवसेनेचाच आहे. त्यामुळे या जागेवर शिवसेना ठाकरे गटा दावा करत आहेत. तर गडचिरोली मतदारसंघात सध्या भाजपचे अशोक नेते खासदार आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.