LPG cylinder shortage news Maharashtra Saam TV Mrathi
महाराष्ट्र

LPG गॅस सिलिंडर बुकिंगचे नियम पुन्हा बदलले, ग्रामीण अन् शहरी भागासाठी नवी अट

LPG cylinder shortage news Maharashtra : मध्यपूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एलपीजी सिलेंडरचा तुटवडा जाणवत आहे. नव्या नियमानुसार आता शहरात ४० दिवस आणि ग्रामीण भागात ४५ दिवसांनंतरच नवीन सिलेंडर बुक करता येणार असल्याने गॅस एजन्सीवर नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.

Namdeo Kumbhar

LPG Shortage in Maharashtra: इराण-इस्रायल युद्धाच्या झळा आता महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहोचल्याचे दिसत आहे. घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्याचे समजताच बुकिंगसाठी लोकांनी रांगा लावल्या आहेत. त्यातच घरगुती LPG गॅस सिलेंडर वितरण प्रणालीत सरकारकडून पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. बुकिंगच्या या नव्या नियमानुसार दोन सिलेंडर घेण्यामधील कालावधीत मोठी वाढ करण्यात आली आहे. आता ग्रामीण भागात ४५, तर शहरात ४० दिवसांनंतरच नवीन सिलेंडरचे बुकिंग करता येणार आहे. याआधी हे अंतर २५ दिवसांचे होते, ज्यात आता वाढ करण्यात आली आहे. नव्या नियमामुळे सर्वसामान्यांचे हाल होत असून, रत्नागिरीमध्ये गॅस बुकिंगसाठी नागरिकांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत.

सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन समस्या निर्माण होणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. त्यामुळेच आता सामान्य माणूस गॅस एजन्सीबाहेर रांगा लावताना पाहायला मिळत आहे. मोबाईलवरून गॅस बुकिंग होत नसल्यामुळे आता थेट गॅस एजन्सीवर नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. एकूणच सामान्य माणूस या सर्व परिस्थितीमुळे त्रस्त झाल्याचे चित्र दिसतेय. कराड येथील 'भारत गॅस एजन्सी' येथील परिस्थितीचा आढावा घेऊन सामान्य नागरिकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांनी.

पोलीस बंदोबस्तात सिलेंडरचे वितरण

गेल्या काही दिवसांपासून आखाती देशांत होत असलेल्या युद्धामुळे मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा तुटवडा भासत आहे. सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांच्या गॅस एजन्सीवर मोठ्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे अमरावती आणि कोल्हापूरमध्ये पोलिसांच्या बंदोबस्तात सिलेंडरचे वाटप करण्यात येत आहे. गॅस वितरण करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उन्हाचे चटके सोसत अनेक नागरिक रिकाम्या गॅस टाक्या घेऊन रांगेत उभे आहेत.

ग्राहकांच्या सकाळपासून रांगा

युद्धजन्य परिस्थितीनंतर अनेक गॅस एजन्सीवर ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. मुंबई, पुणे, नाशिकसह महाराष्ट्रातील मोठ्या शहरांत आणि ग्रामीण भागात मोठी गर्दी बघायला मिळत आहे. वाशिममध्ये सर्व्हर डाऊन असल्यामुळे गॅस नोंदणी होत नाहीये, त्यामुळे सकाळपासून गॅस एजन्सीबाहेर नागरिक रांगेत उभे आहेत.

८० वाहने जप्त; आरटीओची मोठी कारवाई

नंदुरबार जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅसचा वाहनांमध्ये बेकायदेशीर वापर करणाऱ्या वाहनांवर आरटीओ विभागाने मोठी कारवाई केली आहे. विशेष तपासणी मोहिमेदरम्यान तब्बल ८० वाहने जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे गॅसच्या काळाबाजाराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. तपासणीदरम्यान अनेक वाहनांमध्ये घरगुती एलपीजी सिलेंडरचा वापर होत असल्याचे आढळून आले. संबंधित वाहनधारकांकडून तात्काळ सिलेंडर काढून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भविष्यात अशा प्रकारे घरगुती गॅसचा वापर करताना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gas pain vs heart attack: सारखं छातीत दुखतंय....अॅसिडिटी की हार्ट अटॅकचं लक्षण? सोप्या भाषेत फरक समजून घ्या

Maharashtra Live News Update : कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरात पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण

Mumbai: गॅस सिलिंडरचा तुटवडा, भाजी मार्केटला फटका; ग्राहकांनी भाजी खरेदीकडे फिरवली पाठ

Nashik Tourism: नक्कीच माथेरान-महाबळेश्वर विसराल, नाशिकपासून ४५ किमी दूर आहे हे सुंदर हिल स्टेशन

Jio Recharge : जिओचा स्वस्त रिचार्ज प्लान, 336 दिवसांची वैधता अन् अनलिमिटेड कॉलिंग, जाणून घ्या किंमत

SCROLL FOR NEXT