MAHARASHTRA RAIN ALERT: HEAVY TO EXTREMELY HEAVY RAIN FORECAST FOR FIVE DAYS, WILL SCHOOLS REMAIN CLOSED TOMORROW? saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; उद्याही शाळांना सुट्टी मिळणार का?

Maharashtra Rain Update: भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अनेक जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आल्याने शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात येतील का याकडे लक्ष लागले आहे.

Bharat Jadhav

  • पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

  • नाशिकमध्ये ढगफुटीसदृश्य पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

  • पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रोहा आणि चिपळूण परिसरात अतिवृष्टीचा धोका कायम आहे.

महाराष्ट्रात पावसानं सध्या धुमाकूळ घातलाय. नाशिकमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. रोहा, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, चिपळूण या ठिकाणी महापुराचं सावट आहे. तर मुंबई आणि उपनगरांत पावसाने तूर्तास विश्रांती घेतली आहे. इथे ६० ते ७० किमी ताशी वेगानं वादळी वारे सुरू आहेत.

आजही राज्यातल्या अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नाशिकमध्ये शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात काल रात्री पासूनच अतीमुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांना उद्याही सुट्टी मिळेल का असा प्रश्न पालकांकडून विचारला जातोय.

गेल्या दोन ते तीन दिवसापासून मुंबई, कोकण, ठाणे आणि पुणे, नाशिक भागात जोरदार पाऊस होतोय. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा महाविद्यालयांना सुट्टी दिली होती. आता पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस होईल असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवलाय. त्यामुळे उद्याही शाळा, महाविद्यालयांना सुट्टी असेल का असा प्रश्न केला जातोय.

दरम्यान नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केलीय. त्र्यंबकेश्वर आणि आसपासच्या परिसरात होत असलेल्या संततधार व मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्र्यंबकेश्वर-खोडाळा मार्गावरील नव्याने बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या बाजूला मातीचा भराव टाकून तयार करण्यात आलेला कच्चा पूल पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे वाहून गेलाय.

पालघर, नारशक घाट, रायगड, रत्नारगरी, कोल्हापूर घाट, ब लढाणा, अकोला, अमरावती, वर्धा यासाठी उद्या यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नारगरी, सातारा घाट, पुणे घाट, यवतमाळ, चुंद्रपूर, गडरचिरोली, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर , गडरचरोली आदी जिल्ह्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : खळबळजनक! प्रेमात पतीचा अडथळा, पत्नीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काटा; शीर धडावेगळं केलं

एकनाथ महाराजांची पालखी रोखणार? ऐन वारीत जुना वाद उफाळला; वारकरी चिंतेत

Maharashtra News Live Update: नांदूर मधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवला

रक्षकच बनला भक्षक! अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ, पोलीस उपनिरीक्षकाला ठोकल्या बेड्या

Vande Bharat Express : देशातल्या सर्वात सुंदर वंदे भारत रेल्वे प्रवास! आयुष्यात एकदातरी अनुभवायलाच हवेत हे ८ निसर्गरम्य मार्ग

SCROLL FOR NEXT