Maharashtra Farmers News Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Farmers News: सोयाबीनचं उत्पादन घटलं, खर्चही निघाला नाही, तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Maharashtra Farmers News: राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे, मराठवाड्यातील मागासलेला जिल्हा म्हणून ओळख असलेल्या हिंगोली जिल्ह्यात मागील वर्षभरात सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून 30 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल आहे.

Sandeep Gawade

संदीप नागरे

Maharashtra Farmers News

राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. मराठवाड्यातील मागासलेला जिल्हा म्हणून ओळख असलेल्या हिंगोली जिल्ह्यात मागील वर्षभरात सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून 30 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल आहे. आज पुन्हा एकदा हिंगोली तालुक्यातील पिंपळखुटा गावातील अल्पभूधारक शेतकरी सुरेश बोन्द्राजी जाधव या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात झाडाला गळफास घेऊन आपलं जीवन संपवल आहे.

कोरडवाहू शेतकरी असलेल्या सुरेश जाधव यांच्या शेतात खरीप हंगामातील सोयाबीन पीक घेतलं होत. मात्र पिकाला योग्यवेळी पाणी मिळालं नसल्याने जाधव यांच्या शेतातील सोयाबीनचे उत्पादन घटल आणि लागवड खर्च देखील निघाला नाही. बँकेकडून घेतलेले पीक कर्ज आणि खाजगी सावकाराचं डोक्यावर असलेला कर्ज फेडायचे मुलाबाळांचे शिक्षण कसे भागवायचे, या विवंचनेत शेतकरी जाधव असल्याची माहिती आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी कुटुंबाला शेतात जाऊन येतो असं सांगून बाहेर पडलेल्या जाधव यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. जाधव यांच्या आत्महत्येने कुटुंबाला मोठा धक्का बसला असून , संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडलं आहे. सरकारने आता तरी आम्हाला कर्जमाफी द्यावी आणि डोक्यावरील कर्जाचा बोझा कमी करावा अशी विनंती जाधव कुटुंबाने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

SCROLL FOR NEXT