राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली
महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ जाहीर करण्यात आले
५० हजार कोटींची गुंतवणूक आणि ५ लाख रोजगार निर्मिती केली जाणार
डॉ. आंबेडकर यांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीसाठी ५०० कोटींची विकास योजना
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ३ महत्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ जाहीर करण्यात आले. या धोरणाच्या कालावधीत ५ लाखांपेक्षा जास्त रोजगारांची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.
त्याचसोबत द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासासाठी योजनेची घोषणा करण्यात आली. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं आणि काय निर्णय घेण्यात आले हे आपण जाणून घेणार आहोत...
महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ जाहीर करण्यात आले. धोरण कालावधीत ५० हजार कोटींची गुंतवणूक, ५ लाखांवर रोजगार निर्मिती केली जाणार आहे. राज्यात १५ समर्पित बांबू क्लस्टर्स तयार करण्यात येणार आहेत. कार्बन क्रेडिट बाजारपेठेचा लाभ घेण्यात येणार आहे. राज्यात बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगाला चालना. शेतकऱ्यांना नगदी पिकांसारखा आणखी एक पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्न पर्याय असेल .
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासासाठी योजना जाहीर करण्यात आली. सोसायटीच्या शैक्षणिक संस्था, वसतिगृहांच्या इमारतींचा जिर्णोध्दार, जतन आणि संवर्धन करण्याकरीता नियोजन केले जाणार आहे. मुंबई, छत्रपती संभाजीनगरमधील नऊ शिक्षण संस्था, दोन वसतीगृहांचे अद्ययावतीकरण. पाच वर्षांसाठी ५०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबईसह, अपील शाखा आणि नागपूर, औरंगाबाद खंडपीठांकरीता गट अ ते ड संवर्गात २ हजार २२८ पदांची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठीच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.