Kolhapur News Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur: आश्वासनांचा पाऊस पण सत्य वेगळंच, २० वर्षे गावात रस्ता नाही; रुग्णांना घ्यावा लागतो बैलगाडीचा आधार

Kolhapur News: राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या जिल्ह्यातील स्थिती खूपच वाईट आहे. याठिकाणी गावात रस्ता नसल्यामुळे गावकऱ्यांना चिखल तुडवत जावे लागत आहे. तर रुग्णांना बैलगाडीचा आधार घ्यावा लागत आहे.

Priya More

रणजित माजगावकर, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात जाण्यास रस्ताच नसल्यानं रुग्ण, गरोदर महिला तसंच विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. निवडणूक कोणतीही असो जिल्ह्याच्या राजकारणात नेहमी सत्ताकेंद्री राहिलेले राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ प्रत्येक विधानसभा निवडणुकीत कागल विधानसभा मतदारसंघाची बारामती करू, असं आश्वासन जनतेला देतात. मात्र, त्यांच्याच मतदारसंघात दिव्याखाली अंधार असल्याचा प्रकार समोर आला आहे.

कागल विधानसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या गडहिंग्लज शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बड्याचीवाडी गावात मुख्य रस्ताच नसल्याने ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थी आणि महिलांना गुडघाभर चिखलातून वाट काढावी लागते. आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय उपचाराला नेतानाही आजही रुग्णांना बैलगाडीचा आधार घ्यावा लागतो. यामुळे हा रस्ता तातडीनं करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरापासून जवळ असलेल्या बड्याचीवाडी गावात ७० ते ८० कुटुंब राहतात. मुख्य रस्त्यापासून गावात जाणारा सुमारे दीड किलोमीटर रस्ता वहिवाटीचा असूनही ग्रामपंचायत निवडणुकीत रस्ता पूर्ण करण्याचं आश्वासन देवूनही गेली २० वर्षे या रस्त्याला डांबर लागलं नाही.

गावाशेजारी असलेल्या सुमारे ३० कुटुंबातील नागरिकांनी वेळोवेळी कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि विद्यमान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, तहसीलदार ऋषिकेत शेळके यांना अर्ज, विनंती करूनही रस्त्याचं काम काही झालं नाही. गावातील सुंदराबाई दळवी यांना वयोमानानुसार अस्वस्थ वाटू लागल्यामुळं वैद्यकीय उपचाराची गरज होती. मात्र, घरापर्यंत यायला रस्ताच नसल्यानं डॉक्टरांनीही यायला नकार दिला, तर २० ते २५ घरं असलेल्या या भागात गरोदर असलेल्या मातांना थेट माहेरी पाठवलं जातं, कारण वाहतुकीसाठी घरापर्यंत यायला रुग्णवाहिकेलाही वाट मिळत नाही.

वर्षानुवर्षे बड्याचीवाडी ग्रामस्थांना हा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कागल मतदारसंघाची बारामती करतो, अशी घोषणा मतदारसंघाचे आमदार मंत्री हसन मुश्रीफ प्रत्येक निवडणुकीत करतात. मात्र, ११ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत विरोधक असलेल्या समरजीत घाटगे यांची सत्ता असल्यामुळंच या गावाला विकासापासून वाळीत टाकलं आहे का? असा सवालही ग्रामस्थांनी केला आहे. वर्षानुवर्षे रखडलेला हा रस्ता तातडीनं करावा, अशी मागणी गावातील ग्रामस्थांनी केली.

मुलांच्या शाळा सुरू झाल्यामुळं गावापासून दोन किलोमीटर असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना जावं लागतं. मात्र, त्यांची वाट चिखलातून जात असल्यामुळं अनेकजण पालकांकडं शाळेत न जाण्याचा हट्ट करत आहेत. किमान शालेय विद्यार्थी, रुग्ण आणि महिलांसाठी मार्ग तयार करावा, रस्त्याची डागडुजी करावी, असं पत्र तहसीलदारांनी ग्रामपंचायतीला पाठवलं. मात्र, जिल्ह्यात संततधार पाऊस कायम असल्यामुळं हा रस्ता करण्यासही अडथळा निर्माण होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

SCROLL FOR NEXT