Kolhapur Jotiba Chaitra Yatra, Coconut saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Jotiba Chaitra Yatra : चैत्र यात्रेत जोतिबाला जाणार आहात ? वाचा नवे निर्बंध

आगामी काळात जाेतिबा मंदिरात भाविकांची हाेणारी गर्दी लक्षात घेता प्रशासन सज्ज झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- रणजित माजगावकर

Kolhapur News : दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिरात नारळाचे केसर काढण्यास, खोबऱ्यांची वाटी उधळण्यास मनाई करण्यात आली आहे. व्यापाऱ्यांनी केसर काढून नारळ, खोबऱ्यांचे तुकडे करून विक्री करावी असा आदेश जिल्हा प्रशासनाने काढला आहे. (Breaking Marathi News)

चैत्र यात्रेत जोतिबा मंदिरात (Jotiba Chaitra Yatra) भाविकांची माेठी गर्दी असते. केसर काढून नारळ फोडताना केसराचा ढीग पडतो. हा ढिग लवकर बाजूला होत नाही. त्यामुळे भाविकांची अडचण होते. तसेच यात्रेत गुलाल- खोबरे मोठ्या प्रमाणात उधळण्यात येते. यामध्ये अखंड खोबऱ्यांची वाटी सुद्धा पालखी, सासनकाठीवर उधळली जाते.

अखंड खोबऱ्यांची वाटीमुळे भाविक जखमी होतात. उंचीवरून व लांबून आलेल्या खोबऱ्यांच्या वाटीचा मार भाविकांना जोरात बसतो. यावर उपाय म्हणून प्रशासनाने जोतिबा मंदिरात नारळाचे केसर काढणे आणि दुकानात खोबऱ्यांची वाटी विक्रीस मनाई केली आहे. व्यापाऱ्यांनी केसर काढून आणि खोबऱ्यांचे तुकडे करून विक्री करण्याचे आदेश दिले आहेत.

सहकार्याची अपेक्षा

साम टीव्हीशी बाेलताना तहसीलदार रमेश शेंडगे (tashildar ramesh shendge) म्हणाले नारळाचा कचरा पडतो. नारळपाणी सांडून भाविक घसरून पडतात. हे टाळण्यासाठी नारळ केसर काढून देण्याबाबत आदेश दिला आहे. व्यापारी, दुकानदार आणि भाविकांनी सहकार्य करून यात्रा सुरळीत पार पाडावी.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मविआनं सरकारला पाठवलं 15 प्रश्नांचं पत्र; उत्तर देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी काढल्या शुद्धलेखनाच्या चुका

चड्डी बनियान गँग, त्यांनी त्यांची अब्रू वेशीला टांगलीय; एकनाथ शिंदे का भडकले? पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील दाजीपूर फोंडा घाट परिसरात तुफान पाऊस

लाडकी बहीण योजना, अजितदादांची आठवण, महाराष्ट्राचा विकास; अधिवेशनच्या पूर्वसंध्येला सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

मुख्यमंत्री बदलणार? आमदार एकवटले म्हणाले आम्हाला बदल पाहिजे; 26 फेब्रुवारीला हायकमांड दिल्लीत निर्णय देणार

SCROLL FOR NEXT