farmers protests at pune irragation office for ujani dam water saam tv
महाराष्ट्र

Ujani Dam Water Level : उजनीच्या पाण्यासाठी पुण्यातील सिंचन भवनासमोर शेतक-यांचा टाहाे

साेलापूर जिल्ह्यात शेतीसह पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

भारत नागणे

Pandharpur News : उजनी धरणातून उजवा आणि डाव्या कालव्यातून पाणी सोडावे या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी पुणे येथे सिंचन भवनासमोर आंदोलन सुरू केलें आहे. या आंदाेलनात माेठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले आहेत. (Maharashtra News)

आॅगस्ट महिना संपला तरी अद्याप सोलापूर जिल्ह्यात पाऊस नाही. त्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी उभी पिके जळू लागली आहेत. सध्या उजनी धरणात 13 टक्के पाणीसाठा (ujani dam water level) शिल्लक आहे. येत्या काही दिवसांत पाणी सोडावे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा प्रभाकर देशमुख यांनी दिला आहे.

पाण्याअभावी शेतकरी हतबल

दरम्यान पावसाने ओढ दिल्याने पंढरपूर व परिसरात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस नसल्याने उभे जळू लागली आहेत. त्यामुळे शेतक-यांवर मोठं संकट ओढावले आहे.

हजारो रूपये पेरणीसाठी खर्च करून ही पिकं जळू लागल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील शेतकरी संभाजी चव्हाण यांनी पाण्याअभावी जळू लागले उभे मक्याचे पिकं रोटावेटरने आज नांगरून टाकले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यात विसर्जनासाठी गेलेले ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT