Vidarbha Heat Wave  Saam TV
महाराष्ट्र

Vidarbha Heat Wave : सावधान! आजपासून विदर्भातील उष्णतेची लाट आणखी वाढणार; हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Vidarbha Weather Report : विदर्भातील तापमानात साधारणपणे 2 ते 3 अंशाने आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. काल नागपूरतील तापमान 42.6 अंश सेल्सीअस असल्याची नोंद झाली होती.

Ruchika Jadhav

पराग ढोबळे, साम टीव्ही

राज्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. अशात आजपासून विदर्भ आणखी तापण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील काही दिवस उष्णतेची लाट राहील असा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला आहे. यामुळे नागरिकांना आता आणखी काळजी घेण्याची गरज आहे.

तापमानात आणखी वाढ

विदर्भातील तापमानात साधारणपणे 2 ते 3 अंशाने आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. काल नागपूरतील तापमान 42.6 अंश सेल्सीअस असल्याची नोंद झाली होती. विदर्भातील सर्वाधिक तापमान हे अकोला जिल्ह्यातील आहे. अकोल्यात 45.8 अंश तापमान नोंदवले गेलं आहे.

विदर्भातील विविध जिल्ह्यांमधील तापमानाची नोंद

वाशीम - 44.2

गडचिरोली - 42.8

चंद्रपूर - 43.4

चंद्रपूर - 43.4

भंडारा 42.3

गोंदिया 41.8

यवतमाळ 44.5

वर्धा - 44.2

अमरावती 44

बुलढाणा 41.5 अंश तापमान काल दीवसभरात नोंदवले गेले आहे.

यवतमाळात यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान

यंदाच्या उन्हाळ्यात काल 44.5 आणि रात्रीचे तापमान 28.5 अंश सेल्सिअस उच्चांकी पातळीवर गेल्याची प्रथमच नोंद झाली. कालचा दिवस यवतमाळमधील सर्वात उष्ण दिवस आणि रात्र ठरली. गेल्या सहा दिवसात यवतमाळमध्ये तापमान 4.4 अंशांनी विक्रमी वाढ झालीय. सरासरीच्या तुलनेत 4 अंशांनी तापमान जास्त राहिले. तीव्र उष्णतेमुळे दुपारी रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता.

एकीकडे उष्णता वाढत आहे तर दुसरीकडे पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. पश्चिम विदर्भात भीषण पाणी टंचाई निर्माण झालीये. पश्चिम विदर्भातील 86 गावात 91 टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. 436 विहिरीचे अधिग्रहण करून तात्पुरत्या उपाय योजना केल्या गेल्यात. सर्वाधिक पाणी टंचाई बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यात असल्याचं समजलं आहे.

पश्चिम विदर्भात घोटभर पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. टँकरवर आमि विहिरीवर पाणी भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी उफाळत आहे. पश्चिम विदर्भात केवळ 25.48 टक्के जलसाठा शिल्लक आहे. तर बुलढाणा जिल्हात सर्वाधिक 67 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. विदर्भात सूर्य आग ओकत असल्याने पाण्याचे स्रोत आटले. तर विहिरीने तळ गाठलाय. मे महिन्याच्या अखेर पश्चिम विदर्भातील 200 गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार असल्याचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT