चामोर्शी तालुक्याच्या अनंतपूर आश्रमशाळेच्या तब्बल 70 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली आहे. वसंतराव नाईक आश्रम शाळेत सोमवारी आरोग्य विभागाचे फिरते रुग्णालयाची रुग्णवाहिकेतील आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांनी 130 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5 गोळ्या वाटल्या आणि रोज 1 गोळी खायला सांगितली.
काही विद्यार्थ्यांनी जेवणानंतर पहिली गोळी खाताच जवळपास 70 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. त्यांना अचानक उलट्या, मळमळ आणि ताप आला. त्यानंतर लगेचच शाळेतील शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना सामान्य रुग्णालयात दाखल केले. काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना सामान्य रुग्णालय चामोर्शी आणि गडचिरोली येथे पाठविण्यात आले होते.
अगोदर वाटले होते, की जेवणात काही विषबाधा झाली असेल पण सर्व जेवण केलेल्या विद्यार्थ्यांपैकी फक्त गोळ्या खाल्लेल्या विद्यार्थ्यांना त्रास जाणवत असल्याचे दिसून आले .जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांच्याशी चर्चा केली असता हा गोळीचा दुष्परिणाम नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे.. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे 12, प्राथमिक आरोग्य केंद्र आमगांव येथे 5 व ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे 31 विद्यार्थी भरती असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
वसंतराव नाईक आश्रम शाळेत आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांसाठी गोळ्या दिल्या होत्या. या गोळ्यांचा काहीही दुष्परिणाम नाही. त्यातील एक-एक गोळी विद्यार्थ्यांनी शाळेतच खाल्ली. त्यानंतर मात्र, विद्यार्थ्यांना काही तासातच त्रास सुरु झाला. यामुळे विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, आधी जेवणातून विषबाधा झाल्याचा संशय होता. मात्र, या गोळ्या खाललेल्या विद्यार्थ्यांनाच फक्त त्रास झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.