school open Saam TV
महाराष्ट्र

Heat Wave News: वाढती उष्णता बनली जीवघेणी, विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

Heat Wave News: वाढत्या उष्णतेमुळे मे महिन्याची सुट्टी आता एप्रिलमध्येच दिली जाणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

Mumbai News : राज्यातील वाढती उष्णता हा चिंतेचा विषय बनला आहे. तापमानाचा पारा वाढत असल्याने नागरिकांना उष्माघाताचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सातत्याने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करत आहे. आता राज्याच्या शिक्षण विभागानेही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. वाढत्या उष्णतेमुळे मे महिन्याची सुट्टी आता एप्रिलमध्येच दिली जाणार आहे.

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातल्या शाळांचा अहवाल मागवला आहे. ज्या शाळांच्या परीक्षा संपल्या आहेत त्यांना सुट्टी मिळणार आहे. वाढत्या उष्णतेमुळे राज्य सरकार हा निर्णय घेणार आहे.

याबाबत लवकरच परिपत्रक काढणार असल्याची माहितीही दीपक केसरक यांनी दिली आहे. सुट्टीत अभ्यास देऊ नये, अशा सूचनाही शिक्षणमंत्र्यांनी दिल्या आहेत. 15 जूनला सगळ्या शाळा सुरू होतील. तर केवळ विदर्भातील शाळा 20 जूनला सुरू होतील, अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.  (Latest Marathi News)

पालकांची मागणी

राज्यातील वाढत्या तापमानामुळे पालकवर्ग चिंतेत आहेत. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर  पालकांनी सीबीएसईसह इतर केंद्रीय बोर्डाच्या शाळा या सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी शाळा प्रशासन आणि शालेय शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे. 

सीबीएसईच्या शाळा या १० मे पर्यंत सुरू राहणार असून त्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या दिल्या जाणार आहेत. मात्र शाळा १० मे पर्यंत सुरू ठेवताना त्या सकाळच्या सत्रात भरवल्या जाव्या, असं पालक वर्गाने पत्र देऊन मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मविआनं सरकारला पाठवलं 15 प्रश्नांचं पत्र; उत्तर देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी काढल्या शुद्धलेखनाच्या चुका

चड्डी बनियान गँग, त्यांनी त्यांची अब्रू वेशीला टांगलीय; एकनाथ शिंदे का भडकले? पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील दाजीपूर फोंडा घाट परिसरात तुफान पाऊस

लाडकी बहीण योजना, अजितदादांची आठवण, महाराष्ट्राचा विकास; अधिवेशनच्या पूर्वसंध्येला सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

मुख्यमंत्री बदलणार? आमदार एकवटले म्हणाले आम्हाला बदल पाहिजे; 26 फेब्रुवारीला हायकमांड दिल्लीत निर्णय देणार

SCROLL FOR NEXT