Heat Stroke Saam tv
महाराष्ट्र

Heat Stroke : उष्माघाताने परळीत भाजी विक्रेत्याचा मृत्यू; बीड जिल्ह्यातही उष्णतेची लाट

Beed News : बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत आहे. या दरम्यान गेल्या ३ दिवसात तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले

विनोद जिरे

बीड : मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला असून तापमान ४३ अंशावर पोहोचले आहे. उष्णतेच्या झळा अधिक तीव्र असून वाढलेल्या तापमानामुळे उष्मघाताचा त्रास होऊन एका भाजी विक्रेत्याचा मृत्यू झाल्याची घटना परळीमध्ये घडली आहे. 

बीड (Beed) जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत आहे. या दरम्यान गेल्या ३ दिवसात तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. दरम्यान परळी येथे एका भाजीपाला विक्रेत्याचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. परळी (Parali) येथील बाजारपेठेत महादेव संभाजी गुट्टे हे भाजीपाला विक्री करतात. भर दुपारी देखील ते बाजारात भाजी विक्रीचे काम करत होते. दरम्यान त्यांना अचानक भोवळ आली. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

उष्माघात टाळण्यासाठी हे करा 

तापमान वाढीमुळे शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. प्रामुख्याने (Temperature) तीव्र उन्हात काम करताना शरीरातील पाणी कमी होत असते. यामुळे उष्माघात होण्याची शक्यता असते. यामुळे भरपूर पाणी, द्रव्य पदार्थ, फळांचा रस प्यावा. तसेच घट्ट कपडे वापरणं टाळावेत. काळे किंवा गडद रंगाचे कपड्यांऐवजी फिक्या रंगाचे कपडे घालावेत. दुपारी उन्हात बाहेर जाणे शक्यतो टाळा. कुलर किंवा एसीमधून लगेच उन्हात जाणे टाळावे. बाहेर जाताना टोपी किंवा रुमाल डोक्यावर असावा. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EVM: उंदराने भेदला स्ट्राँगरुमचा पहारा, स्ट्राँगरुमचा दरवाजा उघडला, राज्यात खळबळ

Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला होणार मराठी पंतप्रधान'; पृथ्वीराज चव्हाणाचं वक्तव्य, राज्यात खळबळ

Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईतील स्थानिक गुंडांकडून भररस्त्यात पोलिसांवर हल्ला

IND vs SA 3rd T20I: भारतीय 'धुरंधरां'चा करिष्मा; ७ विकेट राखत टीम इंडियाचा शानदार विजय, मालिकेत २-१नं आघाडी

ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना बसणार मोठा धक्का; बड्या महिला नेत्या भाजपमध्ये प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT