अमर घटारे
अमरावती : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. यात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये पाच लाख रुपयांचा धनादेश अमरावती जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रदान करण्यात आला.
राज्यात यंदाच्या मान्सूनमध्ये अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने थैमान घातले होते. यामध्ये शेतांमध्ये पाणी साचून शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना आर्थिक झळ बसली आहे. काही शेतकऱ्यांचा तर शेतीसाठी केलेला खर्च देखील निघणे कठीण झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत स्वरूपात रक्कम जमा केली जात आहे.
पाच लाख रुपयांचा धनादेश
अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले असून शासन आणि विविध संस्था मदतीचा हात पुढे करीत आहेत. अशा वेळी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीने देखील मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. बाजार समितीकडून साधारण पाच लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आला आहे. बाजार समितीने दिलेली ही आर्थिक मदत शेतकऱ्यांसाठी दिलासा ठरणारी आहे.
कर्मचाऱ्यांनी दिला एक दिवसाचा पगार
या प्रसंगी अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखेडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश मोरे, तसेच सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या संकट काळात बाजार समितीने दाखवलेली ही सामाजिक जबाबदारी कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यासोबतच कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व कर्मचारी देखील यावेळी एक दिवसाचा पगार या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.