400 year old banyan tree collapsed near at bhose near ratnagiri nagpur highway Saam Digital
महाराष्ट्र

वारकऱ्यांना मायेची सावली देणारा 400 वर्षांपूर्वीचा वटवृक्ष कोसळला, वृक्षासाठी राष्ट्रीय महामार्गाची दिशा बदलली होती; पर्यावरणप्रेमी गहिवरले

विजय पाटील

गेल्या चारशे वर्षांपासून वारकारी आणि वाटसरुंना मायेची सावली देणारा वटवृक्ष अखेर नुकताच कोसळला. सांगलीच्या भोसे नजीक रत्नागिरी- नागपूर महामार्गा लगत असणारा भला मोठा वटवृक्ष कोसळल्याने पर्यावणप्रेमींना हूरहूर लागली आहे.

रत्नागिरी नागपूर महामार्ग बनवताना हा वटवृक्ष काढून टाकण्यात येणार होता. सांगली येथील पर्यावरणप्रेमींनी वटवृक्ष वाचवण्याची मोहिम सुरू केली होती. या आंदोलनात अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील सहभाग घेतला होता.

त्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडीतील पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आंदोलनाची दाखल घेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वटवृक्ष वाचवण्याची विनंती केली होती. गडकरींनी त्यास समंती दिली. त्यानंतर वटवृक्ष वाचवण्यासाठी चक्का महामार्गाची दिशा बदलण्यात आली हाेती. दरम्यान पावसामुळे अखेर हा वटवृक्ष उन्मळून पडला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT