Yogi Adityanath Saam Digital
लोकसभा २०२४

Yogi Adityanath : ते लोकांना विचारतात, भाजप ४०० चा आकडा कसा गाठणार? योगी आदित्यनाथ यांनी काढला विरोधकांना चिमटा

Lok Sabha Election 2024 : समाजवादी पक्ष केवळ 60-62 जागांवर निवडणूक लढवत आहे आणि दिल्लीत सत्ता स्थापनेचं स्पप्न पहात आहेत. सत्ता स्थापनेसाठी २७३ जागांची आवश्यकता असते, असा चिमटा योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादव यांना काढला.

Sandeep Gawade

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते योगी आदित्यनाथ यांची चांदौली येथे जाहीर सभा झाली. ते म्हणाले की, ४०० पारची घोषणा ऐकूनच समाजवादी पक्षाचे नेते चारीमुंड्या चीत होतात. त्यांना माहीत आहे की निवडणूक लढण्यात काहीच अर्थ नाही. ते लोकांना विचारतात की भाजप ४०० पारचा आकडा कसा गाठणार? लोक त्यांना उत्तर देतात. ज्यांनी रामाला आणलं, त्यांना आम्ही आणू, दिल्लीच्या सिंहासनावर रामभक्तच राज्य करणार, असं लोक सांगत असल्याचं योगी म्हणाले.

समाजवादी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना हे माहिती आहे की त्यांच्याकडे लोकसभा निवडणूक लढण्याचं कोणतंही ध्येय नाही. केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी २७३ जागांची आवश्यकता असते आणि समाजवादी पक्ष केवल ६०-६२ जागांवर निवडणूक लढवत आहे.

समाजवादी पक्ष नेहमी रामविरोधी राहिला आहे. ज्याने रामाला अयोध्येत पुन्हा आणलं तो रामभक्तच पुन्हा दिल्लीच्या गादीवर बसणार आहे. विरोधक म्हणतात भाजप ४०० पार जागा कशा मिळवणार पण जनता म्हणते ज्याने रामाला आणलं तोच दिल्लीतून राज्यकारभार चालवणार आहे, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

विरोध विकास विरोधी आहेत. माफीया राजला प्रोत्साहन देणारे आहेत. मात्र नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाचा संपूर्ण जगात सन्मान केला जातो. कॉंग्रेस सरकारच्या काळात तो मिळत नव्हता. नरेंद्र मोदींनी मात्र ते शक्य करून दाखवलं. देशाच्या सीमांवरून आता कोणी घुसखोरी करत नाही. दहशतवादी हल्लो होत नाहीत. नक्षलवाद कमी झाल्याचा दावा आदित्यनाथ यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

SCROLL FOR NEXT