
खेड शिवापूर भागात गो रक्षकांकडून तरूणास अमानुष मारहाण
म्हशी घेऊन जाणाऱ्या ट्रक ड्रायवरला पकडून केली मारहाण...
मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मारहाणीदरम्यान तरूणाला शेण खाऊ घातलं
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
काँग्रेसने आज हिंगोली मध्ये शेतकरी शेतमजूर आणि बेरोजगारीच्या विरोधात पदयात्रा काढली आहे कळमनुरी ते हिंगोली असा 18 किलोमीटरचा प्रवास करत ही पदयात्रा सायंकाळी हिंगोली शहरात दाखल होणार आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ , सचिन नाईक,मोहन जोशी यांच्यासह वरिष्ठ काँग्रेस नेते या पदयात्रेत सहभागी झाले आहेत दरम्यान कळमनुरी शहरातून निघालेल्या या पदयात्रेत शेकडोच्या संख्येने तरुण देखील सहभागी झाले आहेत
सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी भाजपावर केलेल्या टिकेवरून पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी काँग्रेसला टोला लगावाल आहे.11 जिल्हा परिषद सदस्यांवर काँग्रेसला जिल्हा परिषद अध्यक्ष पद मिळवता आला,तर मग त्यांचा विजय झाला,असं म्हणता येईल,अशा शब्दात मंत्री
पाटील यांनी विशाल पाटलांना टोला लगावलाय. खासदार विशाल पाटलांकडून भाजपवर टीका करताना सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपाचा जनतेने पराभव केला आहे,त्यामुळे भाजपाने आता पराभवाची सवय लावावी,अशी टीका विशाल पाटलांकडून करण्यात आली होती,यावरून मंत्री चंद्रकांत पाटलांनी हे प्रत्युत्तर दिला आहे,ते सांगलीत बोलत होते.
जालन्यातील भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातील रस्त्यांसाठी तब्बल 25 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भोकरदन च्या प्रभात मतदारसंघातील चार महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामासाठी हा 25 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. भोकरदन जाफराबाद मतदार संघाचे आमदार संतोष दानवे यांनी या रस्त्याच्या मागणीचे पत्र काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना दिलं होतं आणि या कामाला या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मंजुरी मिळाली आहे.
राज्यातील नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा तळागाळापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी राज्य सरकारकडून मार्च ते मे या कालावधीत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियान राबविण्यात येत आहे . याची माहिती तालुक्यातील गावागावात पोहोचावि म्हणून शहापूर तहसीलदार यांच्या मार्फत जनजागृती करण्यासाठी गावागावात व आदिवासी पाड्यात जाऊन घोगडी बैठक सुरू करण्यात आली आहे यात शेतकऱ्यांनी व विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचे कस्या पद्धतीने लाभ घ्यावा याची माहिती दिली जात आहे.
वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील अडोळ प्रकल्पातील पाणीपातळी झपाट्याने खालावल्याने शेती सिंचनासाठी दिला जाणारा पाणी उपसा सध्या बंद करण्यात आला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील कांदा आणि गहू पिकांवर संकट निर्माण झाले आहे. प्रकल्प परिसरातील वीज पुरवठा बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना पाणी उपसा करता येत नाही. परिणामी बोराळा, ढोरखेडा, ताकतोडा, वाघी, खंडाळा आणि शेलगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहेत. वाढत्या उन्हामुळे विहिरी आणि कूपनलिकांची पातळीही कमी होत असून शेतकऱ्यांसमोर पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुणे शहरातील महानगरपालिकेच्या गॅस आधारित दाहिन्या तात्पुरत्या बंद ठेवण्यात येणार
भारत सरकारच्या अधिपत्याखालील पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार देशभरात उपलब्ध असलेल्या प्रोपेन व ब्यूटेन या घटकांचा वापर प्रामुख्याने घरगुती एलपीजी पुरवठ्यासाठी प्राधान्याने करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
गॅस उपलब्धतेमध्ये तुटवडा निर्माण झाल्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत आहेत.नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी विद्युत दाहिनी व APC (Air Pollution Control) प्रणालीवर आधारित दाहिन्या सुरू ठेवण्यात येणार आहेत
वैकुंठ स्मशानभूमी येथे कार्यरत असलेल्या तीन गॅस दाहिन्या तात्पुरत्या बंद राहतील.त्याऐवजी नागरिकांच्या सोयीसाठी तेथील पाच विद्युत दाहिन्या कार्यरत ठेवण्यात येणार आहेत,
अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या विद्युत विभागामार्फत देण्यात आली आहे.
पुणे महापालिका आयुक्तांनी काढले आदेश
लातूर जिल्ह्यात दहा पंचायत समिती असून आज दुपारी या पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडी होणार आहेत. जिल्ह्यातील लातूर आणि जळकोट पंचायत समितीत काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्याने या ठिकाणी काँग्रेसचा सभापती होणार आहे. तर औसा ,निलंगा आणि देवणी या पंचायत समितीवर भाजपाचे वर्चस्व निर्माण झाल्याने भाजपाचा सभापती होणार आहे. चाकूर उदगीर आणि अहमदपूरचे सूत्र हे राष्ट्रवादीकडे असल्याने या ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता येणार आहे, मात्र रेनापुर आणि शिरूर आंतपाळ या ठिकाणी सर्वांचे लक्ष लागले आहे. रेनापुर पंचायत समितीवर मनसेचा सभापती निश्चित आहे मात्र मनसे आणि भाजप एकत्र येणार की, मनसे काँग्रेस सोबत सत्तेत बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले.
राज ठाकरेंच्या मनसेचा आज वर्धापन दिन
रायगडाच्या पायथ्याशी होणार वर्धापन दिन
राज ठाकरेंसह कार्यकर्ते रायगडावर दाखळ
मेळघाटातील आदिवासीच्या प्रश्नावर बच्चू कडू आज आक्रमक होणार..
मेळघाटातील चिखलदरा तहसील कार्यालयावर आज दुपारी बच्चू कडूचे तांडव आंदोलन.
गेल्या 8 दिवसापासून मेळघाटातील अनेक भागात मेळघाटच्या प्रश्नांसाठी बच्चू कडू यांनी काढली पदयात्रा..
बच्चू कडूच्या आंदोलनामुळे प्रशासकीय यंत्रणा मात्र सतर्क..
मार्चमध्ये पहिल्याच आठवड्यात पुणे तापलं...
लोहगाव,कोरेगाव पार्क परिसरात तापमान 39 अंशावर
यंदाच्या मार्चमधील सर्वाधिक तापमानाची नोंद
दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट
बारा ते चार काम असल्यास बाहेर पडा आणि उन्हापासून काळजी घ्या, हवामान खात्याच आवाहन
कोणत्या परिसरात किती तापमान
कोरेगाव पार्क 39 अंश
लोहगाव 39 अंश
शिवाजीनगर 37 अंश
पाषाण 37 अंश
लवळे 37 अंश
मगरपट्टा 36 अंश
एनडीए 36 अंश
पुणे महापालिकेच्या आज अर्थ संकल्प होणार सादर
महापालिका आयुक्त नवल किशोर राम करणार अर्थसंकल्प सादर
कोणत्या नवीन प्रकल्पांना तरतूद मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष
कोणत्या नवीन योजनांचा समावेश होणार याकडे सगळ्यांचं लक्ष
आज आयुक्त करणार अर्थसंकल्प सादर
पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी नाराजी टाळण्याचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा प्रयत्न
अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी मागवले इच्छुकांचे अर्ज
पहिल्यांदाच इच्छुकांचे अर्ज मागावण्यात आले आहेत
सुनेत्रा पवार या आता अर्जावर निर्णय घेणार आहेत
१८ मार्च ला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणुका होत आहेत
गेल्या आठवड्यात पक्षाच्या बैठकीत सर्वाधिकार हे सुनेत्रा पवार यांना देण्यात आले आहेत
वीरधवल जगदाळे,विवेक वळसे पाटील, अंकिता पाटील ठाकरे,शांताराम इंगोले इच्छुक
जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसची नोंदणी करण्यात आली आहे
रत्नागिरीत सध्या धुक्याची चादर पहायला मिळतेय.या पडलेल्या धुक्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागतेय.त्यामुळे वाहनांचा वेग देखील मंदावलाय.रात्री गर्मी ,दिवसा कडकडीत उन आणि पहाटे गारवा असं वातावरण सध्या रत्नागिरीकरांना अनुभवायला मिळतय.या दाट धुक्यामुळे कोकणच्या सौंदर्यात आणखी
भारताच्या टी 20 विश्वचषक जिंकल्यानंतर सांगलीच्या मिरजेमध्ये जल्लोषादरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांचा सौम्य लाठीमार करण्यात आला. मिरजेतील लक्ष्मी मार्केट परिसरामध्ये जल्लोष करण्यासाठी नागरिक जमले होते. यावेळी जल्लोषा दरम्यान काही जणांनी हुल्लडबाजी केल्याने पोलिसांनी लाठीमार करून हुल्लडबाजी करणाऱ्यांना पिटाळून लावले. जल्लोष करण्यासाठी पोलिसांनी परवानगी दिली होती. परंतु काही जणांच्या हुल्लबाजीमुळे गोंधळ निर्माण झाल्याने पोलिसांना लाठीमार करावयास लागला. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20 वा वर्धापन दिन किल्ले रायगडाच्या पायथ्याशी हिरकणी वाडी येथे काही वेळात साजरा होणार आहे. त्याकरीत हिरकणी वाडी येथे भव्य असा सभा मंडप उभारण्यात आला आहे. राज ठाकरे आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत प्रथम किल्ले रायगडावर जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन नंतर ते हिरकणी वाडी येथे सभास्थानी आपला प्राथमिक सदस्य नोंदणीचा फॉर्म भरणार आहेत. त्या नंतर हि सदस्य नोंदणी महाराष्ट्र भर सुरु होणार आहे.
संयुक्त अरब अमिरातीमध्ये काही काळ वास्तव्यास असलेल्या मुलीने दुबई सोडताना कृतज्ञतेचा भावनिक संदेश देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
भारतात परतताना दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिने तेथील अधिकाऱ्यांप्रती आभार व्यक्त केले.
तनिष्का वीर असे या मुलीचे नाव असून कात्रजमधील वंडर सिटी सोसायटी येथे तिचे कुटुंबीय वास्तव्यास आहेत.ती काही काळ संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहत होती.
भारतात परतण्यापूर्वी तिने दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक फलक हातात धरून मानवतावादी संदेश लिहिला.
पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांसाठी आज मतदान होणार
१३ पंचायत समित्यांच्या १४६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वाधिक ९० जागांवर विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले आहे.
भाजपचे २८ सदस्य विजयी झाले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) १२, शिवसेना (शिंदे गट)१०,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ४ तर दोन अपक्ष सदस्य निवडून आले आहेत.
आंबेगाव, शिरूर, मावळ, मुळशी, हवेली, पुरंदर, वेल्हे, बारामती आणि इंदापूर पंचायत समितींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट बहुमत आहे.त्यामुळे या ठिकाणी सभापती व उपसभापती पदांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येतील. मात्र जुन्नर, खेड, दौंड आणि भोर येथे चित्र तुलनेने रंगतदार आहे. जुन्नरमध्ये शिवसेना (शिंदे गट) आघाडीवर असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसही मजबूत स्थितीत आहे.
भोरमध्ये राष्ट्रवादी व भाजपचे समसमान सदस्य असल्याने तेथे राजकीय समीकरणे निर्णायक ठरणार आहेत.
सीसीआयने कापूस विक्रीसाठी 15 मार्च पर्यंत मुद्दत वाढ दिली मात्र या मुद्दत वाढीत नवीन शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी नोंदणी करता येत नाहीये असेच सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यात आले आहे. आता केवळ यवतमाळ जिल्ह्यातील नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना स्लाॅट बुकिंग करता येत आहे. त्यातही हजारो शेतकरी नोंदणी प्रक्रियेच्या बाहेर राहिले आहे.स्लाॅट बुकिंग च्या तारखा संपल्या असून त्यामुळे मुदत वाढविल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना कापसाची विक्री करता आलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.