voters complaints about various issues and remaining projects in maval constituency Saam Digital
लोकसभा २०२४

Maval Constituency : मावळ मतदारसंघातील मतदारांच्या अपेक्षांचा भंग, वर्षानुवर्ष सागरी पूल राहिला कागदावरच

जो उमेदवार नागरिकांमध्ये उतरून तळागाळातील कामे करेल त्यांनाच आमचं बहुमूल्य मत देणार अन्यथा मत देणार नाही असा निर्धार मावळ लोकसभेतील मतदारांनी केल्याचे चित्र दिसून येत आहे.

दिलीप कांबळे

मावळ लोकसभा मतदारसंघ हा नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत राहिलेला आहे. मागील दोन वेळा या भागात शिवसेनेचे शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र मागील दहा वर्षात समस्यांचा मात्र ढीग तयार झाल्याच्या भावना मतदारांनी व्यक्त केल्या आहेत. तर काहींनी आमचा खासदार कोण हेच माहीत नाही अशा शब्दांत उत्तर दिली आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मावळ लोकसभा मतदारसंघातील उरण, कर्जत, पनवेल हा भाग तर समस्येच्या विळख्यात सापडला आहे. उरण भागातील नागरिकांना दळणवळण करण्यासाठी तब्बल 50 किलोमीटरचा वळसा घालून यावे लागते. तर अलिबाग येथील जर काही कामगार उरण भागात कामासाठी आले आणि रात्री उशिर झाला तर पुन्हा अलिबागला जाण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.

उरण भागांत मागील कित्येक वर्षांपासून सागरी पूल बांधण्याचे केवळ आश्वासन दिले जाते. ए आर अंतुले या भागाचे नेतृत्व करीत होते तेव्हा हा सागरी पूलाला मंजुरी दिली होती मात्र कित्येक वर्ष झाले हा पूल कागदावरच राहिला. लोकप्रतिनिधी निवडणुकीपुरते आश्वासन देतात आणि निवडणूक झाल्या की विसरून जातात असा आरोप उरण मधील नागरिक करत आहेत.

उरण हा भाग समुद्र किनारी पट्टा आहे. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात मच्छीमार आहे. या मच्छीमारांना बोटीसाठी दहा महिन्यांसाठी डिझेल कोटा हा 48 हजार इतका होता. परंतु मत्स्यव्यवसाय खात्याने कोणताही ठराव न घेता परस्पर बंद केला. तो पूर्ववत करावा अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. याबाबत अनेक बैठका देखील झाल्या, पत्रव्यवहार देखील करण्यात आले परंतु कोणताही ठोस निर्णय याबाबत झाला नाही. त्यामुळे यावेळी उरण भागातील नागरिक केवळ आश्वासन देणाऱ्या उमेदवाराला नाही तर काम करणाऱ्या उमेदवार निवडून देणार असा निर्धार येथील मतदारांनी केला आहे.

(Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

दुसरीकडे पनवेल सारख्या तालुक्यात महानगरपालिका असून देखील अनेक समस्या आहेत. पनवेल मध्ये असणाऱ्या नागरिकांना साडेबारा टक्के परतावा अद्यापही मिळाला नाही. पनवेल नगरपालिकेचे स्वतःचं तळ आहे मात्र पाण्याची मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाली आहे.पनवेल वरून पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेने प्रवास करताना देखील तासतास ट्राफिक मध्ये अडकून पडावे लागते. याबाबत देखील कोणताच ठोस पर्याय किंवा उपाययोजना होताना दिसून येत नाही.

निवडणूक आल्या की उमेदवार येतात मात्र नंतर उमेदवार दिसून येत नाहीत. समस्या सोडवत नाही अशा तक्रारी पनवेल मधील मतदारांनी केल्या आहेत. जो उमेदवार नागरिकांमध्ये उतरून तळागाळातील कामे करेल त्यांनाच आमचं बहुमूल्य मत देणार अन्यथा मत देणार नाही असा निर्धार मावळ लोकसभेतील मतदारांनी केल्याचे चित्र दिसून येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: अपात्र महिलांचा लाभ बंद होणार, 26 लाख लाडकींची चौकशी सुरू, कुटुंबातील 3 लाभार्थ्यांची यादी तयार

Maharashtra Live News Update: मुंबई-नागपूर विशेष ट्रेन 6 तास उलटूनही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये आलीच नाही

Raksha bhandhan 2025 : सुख समृद्धी प्राप्त होणार; या रक्षाबंधनाला ५ राशींच्या लोकांचं आयुष्य चमकणार

Todays Horoscope: आज रक्षाबंधन असून आर्थिक निर्णय मार्गी लागतील; वाचा आजचं राशीभविष्य

Triekadash Yog 2025: १५ ऑगस्टपासून 'या' राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु; बुध-मंगळ तयार करणार पॉवरफुल योग

SCROLL FOR NEXT