Burnt Milk Hacks
Burnt Milk Hacks  Saam Tv
लाईफस्टाईल

Burnt Milk Hacks : थांबा ! जळालेल्या दुधाला टाकून देताय ? स्वयंपाकघरातील या चार पदार्थांनी वाढवा चव

कोमल दामुद्रे

Home Remedies For Burnt Milk : अनेकदा असे होते की, दूध उकळवताना कितीही काळजी घेतली तरी ते जळते. यामुळे आपण ते टाकून देतो. दूध भांड्याला चिकटल्यानंतर त्याच्या उग्र वासामुळे आपल्याला त्याचा वापर करण्यासाठी देखील जीवावर येते.

आपल्या स्वयंपाकघरातील (Kitchen) असे अनेक पदार्थ आहे ज्यामुळे आपण अनेक पदार्थांची चव बदलू शकतो. जळालेले दूध (Milk) आपण काही काळानंतर टाकून देतो. पण काही घरगुतीचा उपाय केल्यास आपल्याला त्याच्या उग्र वासापासून सुटका मिळू शकते.

परंतु, आम्ही तुम्हाला आज असे काही उपाय सांगणार आहोत ज्यामुळे जळलेल्या दुधाचा वापर तुम्ही करु शकता. त्याची चव व येणारा उग्रवास कसा कमी करुन तुम्ही ते दूध पिऊ शकता. स्वयंपाकघरातील असे काही पदार्थ आहेत ज्याचा वापर करुन तुम्ही दुधाची चव वाढवू शकता. जाणून घेऊया त्याबद्दल

1. दुधाचे भांडे बदला

दूध जळाल्यानंतर आपण लगेच त्याचे भांडे बदलावे. यामुळे येणार उग्रवास व जळालेली चव कमी करण्यास मदत होईल.

2. दालचिनी

जळलेल्या दुधाची चव बदलण्यासाठी तुम्ही त्यात दालचिनीच्या काड्या घालू शकता. यामुळे दुधाची चव बदलेल व त्यात एक गोडवा येईल.

3. वेलची

जळालेल्या दुधात २-३ वेलची घालून ते उकळल्यास त्याची चव बदलेल व उग्र वास देखील निघून जाईल. ज्यामुळे दूधात तयार झालेला पिवळा रंग देखील कमी होईल.

4. चॉकलेट पावडर किंवा हळद (Turmeric)

जळलेल्या दुधात गूळ, चॉकलेट, हळद किंवा केशर यांसारख्या गोष्टी घालून त्याचे चांगले पेय बनवता येते. हे पदार्थ दुधात जळलेल्या पदार्थाची चव कमी करण्यास मदत करतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : सूर्या नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू

PM Modi Speech At Kolhapur : जगात भारी कोल्हापुरी... मराठीतून PM मोदींनी केली भाषणाची सुरूवात

Eknath Shinde Speech : 'धणुष्यबाण गेला पंजा आला'; कोल्हापुरातील सभेतून एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

Bus Fire: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ३६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसने घेतला पेट

Priyanka Gandhi: महागाई, बेरोजगारी...; लातूरमधून प्रियांका गांधींचा सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT