बदलती जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे आजकाल तरूणांच्या मागे अनेक समस्या लागल्या आहेत. यामधील एक सतावणारी समस्या म्हणजे रक्तदाबाची समस्या. बहुतांश लोकांना उच्चरक्तदाबाचा त्रास असतो, तर काहींना लो बीपीचाही त्रास जाणवतो.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगभरातील अब्जावधी लोकांना रक्तदाबाशी संबंधित समस्या जाणवतात. जर आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर सामान्यपणे रक्तदाबाची पातळी काय असली पाहिजे हे जाणून घेणं महत्वाचे आहे. चला जाणून घेऊया महिला आणि पुरुषांमध्ये बीपीचं किती प्रमाण योग्य आहे.
आपल्या शरीरात रक्तदाब मोजण्याप्रमाणेच आपल्या वयानुसारही तो किती कमी - जास्त असावा याचा अंदाज लावता येतो. लहान वयात असताना मुलींचा रक्तदाब हा मुलांइतकाच असतो. मात्र पौगंडावस्थेनंतर मुलींचा रक्तदाब मुलांच्या तुलनेत थोडा कमी होतो.
२१ ते ३१ वयोगटातील महिलांचा रक्तदाब हा ११५.५ ते ७०.५ असावा. यानंतर 31 ते 35 वर्षे वयोगटातील महिलांमध्ये याचं प्रमाण ११०.५ आणि ७२.५ इतकं असतं. त्याचप्रमाणे ४० ते ५९ वयोगटातील महिलांमध्ये १२२/७४ बीपी सामान्य आहे आणि ६० वर्षांवरील महिलांमध्ये १३९/६८ बीपी सामान्य आहे.
महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये रक्तबादाची पातळी काहीशी जास्त असली पाहिजे. ३१ ते ३५ वर्षाच्या पुरुषांचा रक्तदाब ते ११४.५ ते ७५.५ दरम्यान असणं गरजेचं आहे. याशिवाय वयाच्या ४० नंतर, याचं प्रमाण वाढतं. या वयात १२४/७७ पर्यंत रक्तदाबाचं सामान्य मानलं जातं. ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांमध्ये सामान्य बीपी १३३/६९ असणं गरजेचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.