जगातील सर्वात मोठं इंजिन गुगलकडून Gemini आणि Google Bard लाँच केल्यानंतर 'एआय' तंत्रज्ञानावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची शक्यता आहे. 'एआय' तंत्रज्ञान वापरण्यावर कंपनी अधिक भर देण्याची शक्यता आहे. यामुळे गुगल कंपनीमधील हजारो कर्मचाऱ्यांचं भविष्य टांगणीला लागलं आहे. याचदरम्यान, गुगल कंपनीतून ३०००० कर्मचाऱ्यांना काढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Latest Marathi News)
'द इन्फॉर्मेशन'च्या वृत्तानुसार, गुगल कंपनीच्या जाहिरात विभागाचे प्रमुख सीन डाउनी यांनी बैठकीत मोठा खुलासा केला आहे. गुगल जाहिरात विभागने पुन्हा एकदा व्यवस्थित नव्याने टीमची बांधणी करणार असल्याची योजना आखली आहे. परंतु कंपनीकडून कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय जाहीर केलेला नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
रिपोर्ट नुसार, कंपनीने 'एआय' तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. 'एआय' तंत्रज्ञानाचा वापर वाढविल्यास कंपनीत कर्मचाऱ्यांची कपात होऊ शकते.
३० हजार कर्मचाऱ्यांची नोकर कपात केल्यास गुगलकडून आतापर्यंतची सर्वात मोठी नोकर कपात मानली जाऊ शकते. गुगलबरोबर अमेझॉन, मेटा आणि ट्विटर कंपन्यांनीही काही महिन्यांपूर्वी कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला होता.
मीडिया रिपोर्टनुसार, गुगलच्या ग्राहक सेवेत 'एआय' तंत्रज्ञानाचा वापर केल्याने त्याचा परिणाम कर्माचाऱ्यांवर होऊ शकतो. गुगलने २०२३ च्या सुरुवातीला १२००० कर्मचाऱ्यांची कपात केली होती.
गुगलने मे महिन्यात 'एआय'शी संबंधित जाहिरात केली होती. गुगलकडून 'एआय' तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय लवकरात लवकर माहिती सर्च करणे आणि जाहिरातीसाठी घेण्यात आला होता. एआय तुमची वेबसाइट स्कॅन करू शकतो, असंही गुगलने सांगितलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.