श्रावण महिना सुरू झाला की उपवासाचे दिवस सुरू होतात. त्यात आता साबुदाणा आणि उपवास याच्या नात्याबद्दल वेगळ सांगायलाच नको. तेच रटाळ साबुदाण्याची खिचडी आणि इतर पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर या रेसिपी नक्की ट्राय करा. श्रावणात वातावरण थंड असते , त्यामुळे पचनास हलके तसेच पौष्टिक हलके पदार्थ खाल्ले पाहिजेत. खाली दिलेल्या रेसिपी उपवासाला एकदम बेस्ट आणि झटपट होणाऱ्या देखील आहेत.
एका भांड्यात भगरीचे पीठ घ्या, त्यात किसलेला बटाटा, शेंगदाण्याचा कूट, मिरची- जिरे पेस्ट, राजगिरा पीठ आणि मीठ एकत्र करा. सुरूवातीला थोडे थोडे पाणी टाकत पीठ घट्ट मळून घ्या. 10 मिनिटे झाकून ठेवा. बटर पेपरवर किंवा सुती कापडावर थोडे तूप लावून पिठाचा गोळा भाकरीसारखा थापा. तव्यावर खरपूस दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. गरमागरम थालीपीठ दह्यासोबत किंवा सॉस सोबत सर्व्ह करा.
रताळी स्वच्छ धुवून घ्या. मग त्याचे जाड काप पाण्यात टाका. पॅनमध्ये तूप गरम करा. तूपात रताळी घोळून घ्या. सोनेरी रंग येईपर्यंत रताळी शिजून घ्या. मग त्यात गुळ टाका. चवीसाठी वेलची पावडर घाला. थोडा वेळ वाफवून. झटपट रताळ्याचे गोड काप तयार
तूपात मखाणे गरम करायला घ्या. मखाणे हलके तांबूस होईपर्यंत भाजून घ्या. क्रश करून बाजूला काढून घ्या. कढईत दूध गरम करा थोडे घट्ट झाल्यावर त्यात भाजलेले मखाणे आणि राजगिरा टाका. हे मिश्रण मंद आचेवर मखाणे मऊ होईपर्यंत उकळून घ्या. शेवटी त्यात गुळ, सुका मेवा आणि वेलची पूड घालून थोडा वेळ शिजू द्या. उपवासाचे पौष्टिक तसेच गरमागरम खीर खाण्यासाठी तयार.