एका ठराविक अंतरानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात, असं ज्योतिष्य शास्त्रामध्ये म्हटलं आहे. ग्रहांच्या या राशी बदलामुळे अनेकदा राशीमध्ये ग्रहांची युती आणि राजयोग निर्माण होतात. ज्याच्या प्रभाव सर्व देशावर आणि जगावर होत असतो. ज्योतिष्य शास्त्रामध्ये हिंदू सणांना देखील खास महत्त्व देण्यात आलं आहे. यंदाच्या वर्षी २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचा सण साजरा केला जाणार आहे.
यंदाच्या वर्षी या दिवशी शश आणि मालव्य राजयोगाची निर्मिती होणार आहे. मालव्य राजयोग हा शुक्र ग्रह उच्च राशीत गोचर करून निर्माण करतोय. तर शश राजयोग हा शनिदेवाद्वारे निर्माण होतो. या राजयोगांची निर्मिती काही राशींचे भाग्य बदलू शकणार आहे. यावेळी कोणत्या राशींसाठी अच्छे दिन येणार आहे ते पाहूयात.
शश आणि मालव्य राजयोग तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहेत. यावेळी तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला काम आणि व्यवसायात विशेष यश मिळू शकणार आहे. आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. गुंतवणूक आणि नवीन योजनांमधून तुम्हाला फायदा होणार आहे.
कुंभ राशीच्या लोकांसाठी शश आणि मालव्य राजयोगाची निर्मिती चांगल्या दिवसांची सुरुवात असू शकणार आहे. शुक्र ग्रह तुमच्या राशीतून दुसऱ्या घरात संक्रमण करणार आहे. तुमचा आत्मविश्वासही उच्च राहणार आहे. या काळात व्यवसायातील अडथळेही दूर होऊ शकतात. नोकरी आणि व्यवसायातही प्रगतीच्या संधी मिळणार आहेत.
शश आणि मालव्य राजयोगाच्या निर्मितीमुळे मिथुन राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात प्रगती मिळू शकणार आहे. तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात चांगली प्रगती मिळू शकते. मीडिया, मार्केटिंग क्षेत्राला विशेष फायदे मिळणार आहेत. तुम्हाला नशीबाची साथ मिळू शकते.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.