Shahrukh khan and salman khan image
Shahrukh khan and salman khan image Saam Tv
मनोरंजन बातम्या

Viral Video: शाहरुख आणि सलमानमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर, खुद्द किंग खाननेच स्पष्ट केले कारण...

Chetan Bodke

Shah Rukh Khan And Salman Khan Viral Video: शाहरुख खान आणि सलमान खान हे केवळ बॉलिवूडचे सुपरस्टारच नाहीत तर चांगले मित्रही आहेत. दोघांनी बॉलिवूडला आतापर्यंत अनेक चित्रपट देखील दिले आहेत. नुकतेच शाहरुख आणि सलमान हे दोघेही 'पठान'मध्ये एकत्र दिसले होते. आता ही जोडी पुन्हा एकदा 'टायगर ३' मध्ये दिसणार आहेत.

जरीही ते आता पक्के मित्र असले तरीही ते एके काळी एकमेकांचे पक्के वैरी होते. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात त्यांच्यात काही वादाचे खटके उडाले आहेत.

शाहरुख खान आणि सलमान खानचा हा जुना व्हिडिओ सध्या बराच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत शाहरुख म्हणतो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, माझ्यात आणि सलमानमध्ये एकदा कडाक्याचे भांडण झाले होते. पण आमच्या भांडणाचे सत्य कोणालाच माहित नाही. आमच्या दोघांमध्ये सर्वात जास्त आनंदीत कोण असतं, यामध्ये अनेकदा वाद- विवाद व्हायचे. आणि आज आम्ही तुम्हाला या मागील मुख्य कारण काय आहे हे सांगणार आहोत.'

पुढे व्हिडिओत शाहरुख म्हणतो, 'जेव्हा सलमानला बोललो की, मी माझ्या घरी जातो, माझ्या परिवाराला भेटतो, त्यांना सर्वांना भेटून मला फार आनंद होतो. ' त्यावर सलमान म्हणतो, 'मी जेव्हा घरी जातो, तेव्हा मला फार आनंद होतो, फक्त इतकंच आहे की, अजून माझं लग्न झालेलं नाही.' असेच त्यांच्यात बोलणं होत असतं. त्यामुळे आमच्यात वाद झाला. शाहरुख खान आणि सलमान खानचा हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Swati Maliwal : सीएम केजरीवाल यांच्या घराबाहेरील CCTV समोर; महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत दिसल्या स्वाती मालीवाल

Today's Marathi News Live: मुलुंड राडा प्रकरण : ५ शिवसैनिकांना अटक

Uddhav Thackeray: इंडिया आघाडी सत्तेत आल्यास तुम्ही पंतप्रधान बनणार का? उद्धव ठाकरे म्हणाले, 'आमचं ठरलंय की...'

Chess Playing Benefits: बुद्धिबळ खेळण्याचे जाणून 'घ्या' फायदे

अमरावती : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा पांढरा कांदा झाला काळा; चांदूर बाजार तालुक्यात सर्वाधिक नुकसान

SCROLL FOR NEXT