Salman Khan House Firing Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan House Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; आरोपींनी गोळीबारानंतर पिस्तुलाचं काय केलं?

Salman Khan News : सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेची टीम आरोपींना घेऊन गुजरातमध्ये दाखल झालेली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Salman Khan House Firing Case

>> सचिन गाड

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर गोळीबार प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन अपडेट्स समोर येत आहे. अभिनेत्याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार केलेल्या दोन आरोपींना कच्छमधून तर एकाची हरियाणातून मुसक्या आवळल्या आहेत. अशातच मुंबई गुन्हे शाखेची टीम आरोपींना घेऊन गुजरातमध्ये दाखल झालेली आहे. पिस्तुलाच्या शोधात गुन्हे शाखेचे पथक गुजरातमध्ये दाखल झालेले आहे.

१४ एप्रिलला पहाटे दोन अज्ञातांनी सलमान खानच्या घराबाहेर अंदाधुंद गोळीबार केला होता. त्या गोळीबारामध्ये कोणालाही कोणतीच इजा पोहोचलेली नाही. आरोपींनी गोळीबार वॉर्निंग म्हणून नाहीतर त्याची हत्या करण्याच्या हेतूनेच गोळीबार केला असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी मुंबईच्या गुन्हे शाखेने दिली होती. गोळीबार केल्यानंतर आरोपी गुजरातमध्ये पळून गेले होते. त्या ठिकाणाहून विकी गुप्ता आणि सागर कुमार पलकला पोलिसांनी अटक केली होती. गोळीबार करण्यासाठी वापरलेल्या पिस्तूलच्या शोधात गुन्हे शाखेचं पथक गुजरातमध्ये दाखल झाले आहे.

मुंबई गुन्हे शाखेची टीम आरोपींना घेऊन गुजरातमध्ये दाखल झालेले आहेत. आरोपींनी तापी नदीत पिस्तूल फेकल्याचा दावा आरोपींनी गुन्हे शाखेकडे केला होता. गोळीबार प्रकरणात वापरलेल्या पिस्तूलच्या शोधात गुन्हे शाखेच पथक आहे. विकी गुप्ता आणि सागर कुमार पलकला पोलिसांनी कच्छ मधून अटक केली होती. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या आदेशावर विक्की गुप्ता आणि सागर पाल यांनी सलमानच्या घरावर गोळीबार केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court: आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा नाही: सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

Mumbai: मुंबईकरांसाठी गुड न्यूड! सांताक्रूझ ते चेंबूर प्रवास सुसाट, फक्त ३५ मिनिटांत पोहचणार

Maharashtra Live News Update: - पुणे आहिल्यानगर महामार्गावर रांजणगाव येथे वाहतुककोंडी

Health Tips: फळं खाल्ल्यानंतर पचण्यासाठी किती वेळ लागतो?

शुभमन गिल ठरला जगातला एकमेव खेळाडू; ICC कडून चौथ्यांदा खास पुरस्कार

SCROLL FOR NEXT