RBI Saam Tv
बिझनेस

RBI KYC Rule: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! KYC च्या नियमांत बदल; थेट ग्राहकांवर होणार परिणाम

RBI KYC Rule Change: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केवायसीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. आता केवायसीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. याचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार आहे.

Siddhi Hande

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता केवायसी करणे अजूनच सोपे होणार आहे. रिझर्व्ह बँकेनुसार, ग्राहकांना केवायसी करणे खूप गरजेचे आहे. आता बँक ग्राहकांना अकाउंट फ्रीज करण्यापूर्वी ३ दिवस आधी रिमाइंडर पाठवणार आहे. ग्राहकांची सुरक्षा आणि बँकिंग सर्व्हिसला अजूनच चांगले बनवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात आरबीआयने निर्देशदेखील जारी केले आहे.

रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार, सर्व बँकांना आणि संस्थेला ग्राहकांना वेळोवेळी केवायसी अपडेट करण्याची माहिती द्यावी लागणार आहे. हे नवीन निर्देश RBI KYC (Amendment)Directions 2025 अंतर्गत जारी केले आहेत. १ जानेवारी २०२६ पासून हे नियम लागू होणार आहे. यामध्ये सर्व योजनांचा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, इलेक्ट्रॉनिक्स बेनिफिट ट्रान्सफर खात्यांचा समावेश असणार आहे.

कोणते नियम बदलणार?

आता बँकांना केवायसी करण्याच्या डेडलाइनच्या आधी तीन वेळा नोटिफिकेशन पाठवावेलागणार आहे. यामध्ये एक मेसेज हा पोस्ट ऑफिसद्वारे पाठवावा लागणार आहे. बाकीचे मेसेज SMS, ईमेल आणि मोबाईल अॅपद्वारे पाठवला जाणार आहे.

KYC साठी होम ब्रँचमध्ये जाण्याची गरज नाही

आता केवायसीच्या नियमांमध्ये अजून बदल झाले आहेत. आता तुम्हाला केवायसी करण्यासाठी होम ब्रँचला जाण्याची गरज नाही. तुमच्या कोणत्याही जवळच्या शाखेत जाऊन केवायसी अपडेट करु शकतात. दरम्यान, आता व्हिडिओ कस्टमर केवायसीलाही मान्यता दिली आहे. तुम्ही व्हिडिओ कॉलच्या माध्यमातूनदेखील केवायसी करु शकतात. ज्येष्ठ नागरिक, एनआरआय, ग्रामीण भागातील लोकांसाठी ही नवीन सुविधा फायदेशीर असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT