Ration Card  yandex
बिझनेस

Ration Card Cancelled: रेशनकार्डधारकांनो, केवायसी करून घ्या अन्यथा सेवा होईल बंद; शेवटची तारीख कधी? जाणून घ्या एका क्लिकवर

Ration Card : भारत केंद्र सरकारने देशातील गरजू आणि गरीब नागरिकांसाठी आतापर्यंत अनेक योजना राबवल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारत केंद्र सरकारने देशातील गरजू आणि गरीब नागरिकांसाठी आतापर्यंत अनेक योजना राबवल्या आहेत. यामध्ये विविध प्रकारच्या योजनांचा समावेश आहे. देशातील करोडो लोकांना या योजनांचा लाभ होतो. हा देशातील गरिबी दुर करण्याचा एक मार्ग आहे. भारतात अनेक लोक दारिद्रय रेषेखालील आहेत.

अशा वेळेस त्यांना दोन वेळचे अन्न सुद्धा मिळणे मुश्किल असते. त्यांच्याकडे एक वेळचे अन्न मिळण्याइतके सुद्धा पैसे नसतात. या समस्यांना लक्षात घेवून भारत सरकारने रेषकार्डावरुन गरीब वर्गातील लोकांना कमी किमतीत रेशन पुरवण्याचे काम सुरु केले आहे.

काही महिन्यांपुर्वी सरकारने रेशनकार्ड धारकांसाठी ई-केवायसी करण्याची मार्गदर्शक तत्वे लागू केली होती. त्यात सर्व रेशनकार्ड धारकांनी ई-केवायसी करणे अनिवार्य होते. त्यासाठी शेवटची तारिख १ डिसेंबर २०२४ असणार आहे.

जर तुम्ही अजुनही तुमच्या रेशनकार्डाची ई-केवायसी प्रक्रिया केली नसेल तर, तुमच्या परिसरात असलेल्या कोणत्याही सरकारी रेशन दुकानात जावून pos मशीनने ई-केवायसी करुन घेवू शकता. अन्यथा तुम्हाला रेशनकार्डावरुन कोणत्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही.

ज्या व्यक्तींकडे दारिद्रय रेषेखालचे रेशनकार्ड आहे त्यांना तांदुळ, गहू, डाळी, तेल या आवश्यक वस्तु अगदी कमी दरात मिळतात. यासाठी सरकारने दारिद्रय रेषेखालील लोकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत शिधापत्रिका देल्या. शिधापत्रिकेच्या मदतीने जवळच्या सरकारी रेशन दुकानात कमी किमतीत तुम्हाला रेशन मिळते.

नुकतीच सरकारने ई-केवायसी केलेल्यांनाच रेशन मिळणार घोषणा केली होती. केवायसीची शेवटची तारिख ३० सप्टेंबर होती. मात्र नंतर ती १ नोब्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. आता मात्र अंतीम तारिख जाहिर करण्यात आली आहे. १ डिसेंबरपर्यंत तुम्ही ई-केवायसी नाही केली तर तुम्हाला रेशन मिळणार नाही. तसेच रेशनकार्डामधून तुमची नावे काढून टाकली जावू शकतात.


Written By: Sakshi Jadhav

Sydney BMW Crash: पोटात ८ महिन्याचं बाळ, भरधाव कारने गर्भवतीला उडवले, एका क्षणात दोघांचाही मृत्यू

Leopard Attack : ऑपरेशन लेपर्ड! बिबट्याच्या नसबंदीसाठी वनविभागाची सर्वात मोठी मोहीम, पण 'या' आव्हानांचे काय?

Maharashtra Live News Update: पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ, रेस्टॉरंटवर टाकला दरोडा

Garlic Benefits: सकाळी रिकाम्या पोटी 1 लसणाची पाकळी खाल्ल्यावर हार्ट अटॅक ते डायबेटीजचा धोका टळतो, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला

Shocking: हे बाळ आमच्या मुलाचं नाही..., सासू-सासऱ्यांकडून चारित्र्यावर संशय; सुनेने ९ महिन्यांच्या मुलीला संपवलं

SCROLL FOR NEXT