पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट
३० लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ
महाराष्ट्रातील १.७० लाख शेतकऱ्यांचीही नावे
केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पीएम किसान योजनेतील लाखो लाभार्थ्यांना २२वा हप्ता न मिळण्याची शक्यता आहे. सरकारने ३० लाख शेतकऱ्यांची नावे सध्या तरी वगळली असल्याची माहिती समोर आले आहे. आधार आणि बँक अकाउंट लिंक नसल्याने या शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर आधार आणि बँक अकाउंट लिंक करायचे आहे अन्यथा त्यांना २२वा हप्ता मिळणार आहे.
विविध राज्यातील लाखो शेतकरी योजनेतून बाद
पीएम किसान योजनेत उत्तर प्रदेशमधील सर्वाधिक शेतकऱ्यांचे आधार आणि बँक अकाउंट लिंक नाहीये. गुजरातमधील २.९० लाख शेतकऱ्यांनी अकाउंट लिंक केले नाही. केरळमधील ६८,७९८ शेतकऱ्यांनी आधार आणि बँक अकाउंट लिंक केले नाही.महाराष्ट्रातील जवळपास १,७२,३४९ शेतकऱ्यांनी आधार आणि बँक अकाउंट लिंक केले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना पीएम किसानचे २००० रुपये मिळणार नाहीये.
महाराष्ट्रातील १.७० लाख शेतकऱ्यांवर टांगती तलवार
महाराष्ट्रातीलदेखील लाखो शेतकऱ्यांचे नाव योजनेतून वगळण्यात आले आहे.१,७२,३४९ शेतकऱ्यांचे आधार आणि बँक अकाउंट लिंक नसल्याने त्यांना हा फटका बसणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना लवकरात लवकर हे काम करण्यास सांगितले आहे. जर तुम्ही अजूनही आधार आणि बँक अकाउंट लिंक केले नसेल तर तुम्हाला फटका बसू शकतो. तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने आधार आणि बँक अकाउंट लिंक करु शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.