केंद्र सरकारने LPG संदर्भात मोठा निर्णय घेतला
PNG कनेक्शन घेतलेल्या ग्राहकांसाठी महत्वाचा माहिती
ग्राहकांना कनेक्शन ट्रान्सफरची संधी मिळणार
सध्या LPG सिलेंडरच्या नियमात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहेत. केंद्र सरकारने नागरिकांच्या सोयीसाठी नियमात बदल केला आहे. यामध्ये ज्या ग्राहकांनी गॅस पाईप लाईन म्हणजेच पीएनजी कनेक्शन घेतलं आहे, त्यांना जास्त सोयीसुविधा देणं हा यामागचा उद्देश आहे.
केंद्र सरकारने २५ मे २०२६ रोजी "लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (पुरवठा आणि वितरण नियमन) सुधारणा आदेश, २०२६" हा निर्णय घेतला. ज्या ग्राहकांकडे PNG कनेक्शन आहे, त्यांना त्यांच्याकडचे LPG कनेक्शन परत करणं आता अनिवार्य केलं जाणार नाही. हा मोठा निर्णय नागरिकांसाठी आणि हॉटेल व्यावसायिकांसाठी खूप महत्वाचा असणार आहे.
सध्याच्या मध्य पूर्वेतल्या ताणामुळे सिलेंडरच्या किमतीमध्येही वाढ करण्यात आली होती. तसेच LPG सिलेंडर देण्याचा कालावधीही वाढवण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांना अनेककाळ संताप सहन करावा लागला होता. त्यातच केंद्र सरकारने ही महत्वाची माहिती दिली.
केंद्र सरकारने पीएनजी कनेक्शनसाठीच्या अर्जांवर सात दिवसांच्या आत प्रक्रिया करण्याचे आदेश जारी केले आहेत. जर तुम्हाला पीएनजी कनेक्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला जास्तीच्या सुविधा देण्याची योजना सरकार प्लान करत आहे.
आता नवीन नियमांनुसार LPG ग्राहकांकडे २ ऑप्शन असतील. जर तुम्ही PNG कनेक्शन घेतलं , तर तुम्ही ३० दिवसांच्या आत तुमचं LPG कनेक्शन बंद करण्यासाठी अर्ज करू शकतात. दुसरा ऑप्शन म्हणजे, तुम्ही भविष्यात LPG कनेक्शन पुन्हा सुरू करण्यासाठी ट्रान्सफर व्हाउचर मिळवू शकतात. सरकारच्या मते, या नियमांचा फायदा जे लोक रोजगार, शिक्षण किंवा इतर कारणांसाठी सतत वेगवेगळ्या शहरांमध्ये स्थलांतरित होतात. तिथे पीएनजी सेवा उपलब्ध नसतात. त्यांच्यासाठी याचा फायदा होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.