Ayushman Bharat Yojana Saam Tv
बिझनेस

Ayushman Bharat Yojana:खुशखबर! 'या' तारखेपासून सत्तरीपार नागरिकांना मिळणार आयुष्मान योजनेचा लाभ; ५ लाखांपर्यंत मोफत उपचार

Ayushman Bharat Yojana Update: केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आता ७० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांनाही लाभ घेता येणार आहे.

Siddhi Hande

केंद्र सरकारने नागरिकांसाठी आतापर्यंत अनेक योजना राबवल्या आहेत. यात नागरिकांसाठी आयुष्मान भारत योजना राबवण्यात आली आहे. सध्या कधी कोणाला काय होईल हे सांगता येत नाही. अनेकदा आपल्याला उपचाराची गरज भासते. अशा काळात आपल्याकडे एकदम पैसे उपलब्ध नसतात. त्यामुळे उपचारासाठी पैशांची मदत दिली जाते. केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजना राबवली आहे.

केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेअंतर्गत नागरिकांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतात. एखादा पेशंट जर अॅडमिट झाला तर त्याच्या उपचाराचा खरच सरकारद्वारे दिला जातो. आता ७० वर्षांपेक्षा मोठ्या वयोगटातील नागरिकांनाही या योजनेचा लाभ घेता येता आहे.

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत याआधी फक्त ६५ वयापर्यंतच्या नागरिकांना लाभ घेता येत होता. मात्र, आता ७० वर्षांवरील नागरिकदेखील या योजनेअंतर्गत अर्ज करु शकतात. त्यांनाही ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. तर आता दिवाळीपासून ७० वर्षांवरील नागरिकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेता येणार आहे, असं सांगण्यात येत होतं.

बजेटमध्ये निर्मला सितारामन यांनी ७० वर्षांवरील नागरिकांनाही आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेता येणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, हा लाभ कधीपासून मिळणार याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न होते. मिडिया रिपोर्टनुसार, आता दिवाळीपासून ७० वर्षीय नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. (Ayushman Bharat Yojana News In Marathi)

या योजनेअंतर्गत तुम्हाला ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतात. यासाठी तुम्हाला आयुष्मान कार्ड काढावे लागते. आयुष्मान कार्ड तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने काढू शकतात. तसेच या योजनेअंतर्गत ई केवायसी करणे गरजेचे आहे. (Ayushman Bharat Yojana)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळेंचं मंत्री संजय सावकारे यांचा कार्यालयाच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन

Akola Politics: भाजपची डोकेदुखी वाढली, अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली, नेमकं काय घडलं?

Pune Accident: नवले पुलावरून जाताना ब्रेक फेल, कंटेनर अनेक वाहनांना उडवत गेला; मृतांचा आकडा वाढण्याची भीती, थरकाप उडवणारा VIDEO

kalakand Recipe: संध्याकाळी गोड खायला आवडतं? मग, आज घरी नक्की बनवा हॉटेल स्टाईल कलाकंद, वाचा सोपी रेसिपी

Pune Navale Bridge Accident: काचांचा ढीग, वाहनं पेटली, ५ जणांचा जागीच मृत्यू पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात | VIDEO

SCROLL FOR NEXT