Shinde Government  saam Tv
ऍग्रो वन

Shinde Government Decision: संत्रा उत्पादकांसाठी खुशखबर; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Bharat Jadhav

(सुरज सावंत)

Orange Processing Centres Shinde Government Decision:

राज्यातील संत्रा उत्पादकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. सरकारने नागपूर, अमरावती, बुलढाणा येथे ८ आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्यास मान्यता दिली आहे. आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रांच्या उभारणीसाठी आणि त्यासाठी लागणाऱ्या सुविधांची उभारणी करण्यासाठी राज्य शासनाच्या सहकार व पणन विभागाने आज अध्यादेश काढून मान्यता दिली. यामुळे संत्रा प्रक्रिया आणि साठवणुकीच्या उद्योगाला चालना मिळणार असून संत्रा उत्पादकांना चार पैसे जास्त मिळण्याची शक्यता झाली आहे. (Latest News)

विदर्भातील नागपूर, काटोल आणि कळमेश्वर, जि. नागपूर व मोर्शी, जि. अमरावती व संग्रामपूर, जि. बुलढाणा येथे हे संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्यात येणार आहेत. नागपूरमध्ये नागपूर,काटोल आणि कळमेश्वर येथे प्रत्येकी १ संत्रा प्राथमिक प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार आहेत. अमरावतीत मोर्शी येथे ३ संत्रा प्राथमिक प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार आहेत. तर बुलढाण्यात संग्रामपूर येथे २ संत्रा प्राथमिक प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार आहेत. तर या तीन जिल्ह्यात १६ संत्रा दुय्यम प्रक्रिया प्रकल्प संख्या उभारले जाणार आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विदर्भातील नागपूर (Nagpur), काटोल आणि कळमेश्वर, जि. नागपूर व मोर्शी, जि. अमरावती व संग्रामपूर, जि. बुलढाणा येथे हे संत्रा प्रक्रिया केंद्रे (Orange Processing centers) उभारण्यात येणार आहेत. नागपूरमध्ये नागपूर,काटोल आणि कळमेश्वर येथे प्रत्येकी १ संत्रा प्राथमिक प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार आहेत. अमरावतीत मोर्शी येथे ३ संत्रा प्राथमिक प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार आहेत. तर बुलढाण्यात संग्रामपूर येथे २ संत्रा प्राथमिक प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार आहेत. तर या तीन जिल्ह्यात १६ संत्रा दुय्यम प्रक्रिया प्रकल्प संख्या उभारले जाणार आहेत.

या योजने अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांसाठी राज्य शासनामार्फत (state government) देण्यात येणारे अर्थसहाय्य हे अनुदान स्वरुपात असणार आहे. या प्रकरल्पांचा सहकारी प्रक्रिया संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, कृषी उत्पन्न बाजार समिती, खासगी उद्योजकांना लाभ होणार आहे. प्राथमिक प्रक्रियांची किंमत ४ कोटी असणार, तर दुय्यम प्रक्रिया प्रकल्पाची किंमत ४० लाख तर उपपदार्थावरील प्रक्रिया प्रकल्पाची किंमत ३० लाखांच्या आत राहील.

विशेष म्हणजे प्रकल्पांच्या अंदाजित किंमतीच्या १५ टक्के खर्च हा स्वनिधीतून करणे आवश्यक असून उर्वरित ८५ टक्के खर्च बँकेकडून कर्ज स्वरुपात मंजूर करून घेता येईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शासनाला सादर करावा लागेल. त्यानंतर शासनाकडून प्रकल्पास ५० टक्के अनुदानही दिले जाणार आहे. राज्यात संत्र्याचे उत्पादन विदर्भातील अमरावती, नागपूर, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात होते. संत्रा फळाचे काढणीनंतर होणारे नुकसान अंदाजे २५ ते ३० टक्के आहे.

राज्यात संत्र्यावर प्रक्रिया करुन मूल्यवर्धीत उत्पादने तयार करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. तसेच उपपदार्थांवर प्रक्रिया करण्याचे प्रमाणदेखील नगण्य आहे. राज्यातील संत्रा उत्पादकांना काढणी केल्यानंतर प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी शासनाकडून वित्तीय सहाय्य उपलब्ध करुन दिल्यास, संत्र्याचे काढणीपश्चात होणारे नुकसान कमी होऊन, संत्रा उत्पादकांना योग्य भाव मिळण्यास मदत होईल. चांगल्या प्रतीचा संत्रा देशांतर्गत व परदेशातील बाजारपेठेत पाठविण्यास मदत होणार आहे. तसेच, संत्र्यावर प्रक्रिया करुन उपपदार्थ तयार केल्यामुळे संत्र्याचे मूल्यवर्धन होण्यास फायदा होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT