ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळा हा हिरवागार थंडावा देणारा ऋतू आहे.
पण पावसाच्या दिवसात अनेकजणांना भरपूर घाम येतो.
असे का होते? यामागचे कारण जाणून घेऊया.
पावसाळ्यात थंडावा असला तरीही वातावरण सारखे बदलत राहते.
पाऊस पडून गेल्यानंतर ऊन पडतं यामुळे अचानक वातावरणातील उष्णता वाढते.
उष्णतेमुळे गरमी वाढते. शरीर थंड रहावे म्हणून घाम येतो.
पावसाळ्यात येणारा घाम कमी करण्यासाठी तुम्ही पुढील उपाय करू शकता.
सैल, हवेशीर असे सुती आणि लिनेनसारख्या कापडाचे कपडे घाला. हे कपडे ओलावा शोषून घेतात.
पुरेसे पाणी प्या यामुळे शरीर आतून थंड राहील. अतिप्रमाणात घाम येत असल्यास हे एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते. तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.