Pandharpur Drought Saam tv
ऍग्रो वन

Pandharpur Drought : पाणी नसल्याने द्राक्षबाग सुकली; दुष्काळामुळे बाग काढण्याची शेतकऱ्यांवर वेळ

Pandharpur News : राज्यात यंदा दुष्काळाची भीषणता अधिक पाहण्यास मिळत आहे. शेतीसाठी तर सोडा पण पिण्यासाठी देखील पाणी मिळत नसल्याची स्थिती अनेक भागात आहे.

भारत नागणे

पंढरपूर : दुष्काळाची धग बागायती असलेल्या पंढरपूर तालुक्यातील फळबागांना बसू लागली आहे. पाणी नसल्याने शेतकऱ्याने फळ बागेवर कुऱ्हाड चालवली आहे. एक महिन्यापासून पाणी नसल्याने जळून गेलेली द्राक्ष बाग शेतकऱ्याने तोडायला सुरुवात केली आहे. 

राज्यात यंदा दुष्काळाची भीषणता अधिक पाहण्यास मिळत आहे. शेतीसाठी तर सोडा पण पिण्यासाठी देखील पाणी मिळत नसल्याची स्थिती अनेक भागात आहे. यात (Drought) दुष्काळाचे भीषण सावट आणि पाणी टंचाई सध्या पंढरपूर तालुक्यात शेतकऱ्याचे हाल करताना दिसत आहे. पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील कासेगाव परिसरातील सर्व शेती ही द्राक्ष बागायत शेती आहे. निरा भाटगरच्या कालव्यातून येणाऱ्या पाण्यावर या परिसरातील बहुतांशी शेती अवलंबून आहे. 

मात्र गेल्या दीड महिन्यापासून कालव्याला पाणी नाही. विहिरी कोरड्या पडल्या आहेत. यामुळे द्राक्ष बागांना पाणी कुठून द्यायचे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर (Farmer) आहे. पनू नसल्याने द्राक्ष बाग उन्हाने जळून खाक झाल्याने द्राक्षबाग पूर्णपणे काढून टाकून घेण्याचा निर्णय आता काही शेतकऱ्यांनी घेतला आहे. शेतकऱ्यांचे यामुळे नुकसान होत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात पावसाची रिपरिप; बळीराजा सुखावला

Mumbai To Kargil : मुंबई ते कारगिल प्रवास कसा करायचा? जाणून घ्या मार्ग, आणि एकूण खर्च

IRCTC Rule: रेल्वेचा मोठा निर्णय! तब्बल २.५ कोटी युजर्सचे अकाउंट केले निष्क्रिय; या नियमात केले बदल

धोनी, कोहली अन् सचिनची वार्षिक कमाई किती? आकडा पाहून बसेल धक्का; रवी शास्त्री म्हणाले..

Bitter Gourd Benefits In Monsoon : पावसाळ्यात खा कारलं, मिळवा आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT