Nashik News Saam tv
ऍग्रो वन

Nashik News : पावसाने ओढ दिल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत; खत विक्री थांबली

Nashik News : नाशिक जिल्ह्यात जूनमध्ये झालेल्या पावसामुळे बऱ्यापैकी पेरण्या आटोपल्या होत्या. मात्र काही पेरण्या खोळंबल्या आहेत. जुननंतर पावसाने ओढ दिली ती जुलै महिना अर्धा संपला तरी आजतागायत कायम आहे

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : एकीकडे राज्यातील अनेक भागात पावसाने हाहाकार माजविला आहे. मुसळधार पावसामुळे शेतीच्ये प्रचंड नुकसान होत आहे. तर दुसरीकडे नाशिकच्या नांदगाव, मनमाडसह ग्रामीण भागात पावसाने ओढ दिलेली आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. तर शेतकऱ्यांसह खते विक्रेते देखील अडचणीत सापडले आहे. 

नाशिक (Nashik) जिल्ह्यात जूनमध्ये झालेल्या पावसामुळे बऱ्यापैकी पेरण्या आटोपल्या होत्या. मात्र काही पेरण्या खोळंबल्या आहेत. जुननंतर पावसाने ओढ दिली ती जुलै महिना अर्धा संपला तरी आजतागायत कायम आहे. दरम्यान राज्यातील सांगली, नागपूर, चंद्रपूर, मुंबई, पुणे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. पाऊस सुरूच असल्याने शेतात मशागत देखील करता येत नाही. तर नाशिक जिल्ह्यात अजूनही पाहिजे तसा पाऊस (Rain) झाला नसल्याने खरिपाच्या पिकांना खतेही देता येत नसल्याने त्याचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादनावर होणार आहे. त्यामुळे शेतकरी (Farmer) चिंतेत सापडला आहे. 

खतांची विक्रीच होईना 

हवामान खात्याने सुरवातीला यंदा चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला होता. या अंदाजानुसार खत विक्रेत्यांनी देखील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मोठ्या प्रमाणात खते भरून ठेवली आहेत. मात्र पाऊस नसल्याने पिकांना खत देता येणे शक्य नाही. यामुळे शेतकरी खते खरेदी करत नाही. यामुळे खते विक्रेते देखील आता अडचणीत सापडले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT