loss of mosambi farm in jalna  Saam Digital
ऍग्रो वन

Jalna Drought: जालना जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता; मोसंबीसह अन्य फळबागा सुकल्या

Siddharth Latkar

- रामनाथ ढाकणे

मोसंबीसाठी अग्रेसर असणाऱ्या जालना जिल्ह्यातच आता मोसंबी, पेरू, डाळिंबसह इतर फळबागावरती शेतकऱ्यांनी दुष्काळाची कुऱ्हाड चालवल्याचे चित्र दिसून येतंय. एकीकडे दुष्काळाची दाहकता पसरल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला समोर जावं लागत आहे. त्याचाच फटका आता फळबागांना देखील बसायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या फळबागा काढून टाकल्यात.

आधीच माणसांना पिण्यासाठी पाणी नाही तर मग फळबागांना पाणी आणायचे कुठून आणि फळबागा वाचवायच्या तरी कशा असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय. जिल्ह्यातील लघु मध्यम प्रकल्पांबरोबरच विहिरींनी देखील आता तळ गाठल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली.

त्यामुळे टँकरच्या पाण्यावरही काही फळबागा वाचवण्याचे प्रयत्न शेतकऱ्यांकडून सुरू आहे. मात्र हा खर्च अधिक झाल्यानंतर अखेर शेतकऱ्यांनी आपल्या फळबागांवरती कुऱ्हाड चालवली. काही शेतकऱ्यांच्या फळबागा या पाण्याअभावी सुकून गेल्या. दरम्यान शासन स्तरावर याबाबत तात्काळ दखल घेऊन फळबागा वाचविण्यासाठी अनुदान द्यावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT