Jalgaon News Saam tv
ऍग्रो वन

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात आणखी एका शेतकऱ्याने संपविले जीवन; कर्जबाजारीपणातून टोकाचे पाऊल

Jalgaon News : सावकाराकडून घेतलेल्या रक्कमेमुळे कर्ज वाढले होते. शेतातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने कर्ज कसे फेडायचे या चिंतेत दशरथ तांदळे होते

Rajesh Sonwane

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील मागील आठवड्यात दोन शेतकरी आत्महत्या झाल्याच्या घटना घडल्यानंतर आता सलग दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याने जीवन संपविले आहे. डोक्यावर असलेल्या कर्जबाजारीपणातून शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. 

जळगाव (Jalgaon) तालुक्यातील दापोरा दशरथ भिमराव तांदळे (वय ५४) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. दापोरा गावात दशरथ तांदळे हे पत्नी, मुलगा, मुलीसह राहत होते. शेतीकाम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते. (Farmer) तसेच खासगी सावकाराकडून घेतलेल्या रक्कमेमुळे कर्ज वाढले होते. शेतातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने कर्ज कसे फेडायचे या चिंतेत दशरथ तांदळे होते. 

कर्ज फेडता येत नसल्याच्या विवंचनेत दशरथ तांदळे यांनी राहत्या घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब कुटुंबियांना समजतात त्यांनी तातडीने शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. कुटुंबीयांनी आक्रोश केला. याबाबत जळगाव तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. जळगाव जिल्ह्यात मागील आठवडाभरात चौथी शेतकरी आत्महत्या आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT