Farmer Death Saam tv
ऍग्रो वन

Lightning Strike: अंगावर वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू; मुंबईला सुरू होते उपचार

अंगावर वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू; मुंबईला सुरू होते उपचार

साम टिव्ही ब्युरो

कळमसरे (जळगाव) : पिंपळकोठे (ता. पारोळा) 9 सप्‍टेंबरला सायंकाळी झालेल्या वादळी पावसात (Rain) येथील बापु डीगंबर शिरसाठ (वय 44) हे पाऊस सुरु झाल्याने शेतातून सायकलीवर येत होते. या दरम्‍यान अंगावर वीज (Lightning Strike) पडल्याने ते जखमी झाले होते. त्यांचावर उपचार सुरू असताना आज (20 सप्‍टेंबर) सकाळी मुंबई (Mumbai) येथे मृत्यू झाला. (Jalgaon News Farmer Death)

बापु शिरसाठ (Farmer) हे आपल्या शेतात कापूस पिकाला फवारणी करायला गेले होते. सायंकाळच्‍या सुमारास अचानक पाऊस, वादळ व विजाचा कडकडाट सुरु झाल्याने ते गावाकडे येऊ लागले. ते सायकलीवर येत असताना अगदी गावाजवळच त्यांच्या अंगावर वीज पडल्याने ते जखमी झाले होते. त्यांच्या मागून येत असलेल्या काही नागरीकांनी त्यांना पाहिले असता गावात येऊन ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ धुळे येथे उपचारासाठी हलविले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबई येथे पुढील उपचारासाठी हलविले होते.

आर्थिक परिस्थिती जेमतेम

बापु शिरसाठ यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांच्या डोक्याला, कानाला फटका बसला होता. त्यांचा मेंदू, कान, एका बाजूच्या हात व पाय पूर्णतः निकामी झाला होता. यावेळी घरातील कर्त्या व्यक्तीवर ही परिस्थिती ओढावल्याने त्यांची पत्नी, मुले यांना अश्रू अनावर झाले होते. त्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने गावातील ग्रामस्थांनी त्यांना सहकार्य करुन रुग्णालयात दाखल केले. मात्र आज उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आज सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असून पच्यात अपंग आई, पत्नी, दोन लहान मुले असा परिवार असून गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT