Jalgaon News Saam tv
ऍग्रो वन

Jalgaon News : दीड वर्षात २९ शेतकऱ्यांनी संपविले जीवन; चाळीसगाव तालुक्यातील विदारक चित्र

साम टिव्ही ब्युरो

मेहुणबारे (जळगाव) : अतिवृष्टीत पिकांचे नुकसान, वाया गेलेला हंगाम व कर्जबाजारीपणातून शेतकरी टोकाची (Jalgaon) भूमिका उचलत आत्महत्या करत असतात. काही केल्या आत्महत्येच्या घटना थांबत नाहीत. असेच विदारक चित्र (Chalisgaon) चाळीसगाव तालुक्यात पाहण्यास मिळत असून मागील दीड वर्षात २९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. (Latest Marathi News)

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी (Farmer) कर्ज काढून पेरणी केली. मात्र पावसाचा खूप मोठा खंड पडल्याने पेरणी करून हाती काहीही आले नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला. यामुळे घरातील खर्च कसा भागवायचा, या विवंचनेने शेतकरी दिसून येत आहेत. यातूनच टोकाचे पाऊल उचलल्याचे कारणे समोर आली आहेत. गेल्या पंधरा महिन्यात तब्बल २९ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली असून मदतीसाठी १५ पात्र ठरले. तर पाच अपात्र असून यातील पाच तालुकास्तरावर प्रलंबित आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एकाच गावात ५ शेतकऱ्यांचे टोकाचे पाऊल 

सर्वाधिक घटनांमध्ये कर्जबाजारीपण हे महत्त्वाचे कारण आहे. पंधरा महिन्यात २९ याचा अर्थ प्रत्येक पंधरा दिवसाला एक आत्महत्या झाल्याची दिसून येते. चिंचगव्हाण येथे सर्वाधिक पाच आत्महत्या झाल्या आहेत. शेतकरी आत्महत्येची १५ प्रकरणे शासन दरबारी मदतीसाठी पात्र ठरली असून, संबंधित कुटुंबांना शासकीय मदतीची प्रतीक्षा आहे. त्यातील काहींना मदत मिळाली आहे तर पाच अपात्र झाली असून, काही प्रकरणे आजही प्रलंबित आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT