Amravati News Saam tv
ऍग्रो वन

Amravati News : केवायसी न केल्यामुळे पीक नुकसानीचे ६४ कोटी रुपये शासनाकडेच; अमरावती जिल्ह्यातील चित्र

Amravati News : अमरावती जिल्ह्यात गेल्या खरीप व रब्बी हंगामामध्ये अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीटी सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणा नुकसान झाले होते

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: खरीप व रब्बी हंगामात झालेल्या पीक नुकसानीची भरपाई म्हणून शासनाकडून मदतीची घोषणा करण्यात आली होती. हा मदत निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार होता. मात्र शेतकऱ्यांनी बँक खाते केवायसी न केल्यामुळे निधी मिळू शकलेला नाही. 

अमरावती (Amravati) जिल्ह्यात गेल्या खरीप व रब्बी हंगामामध्ये अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीटी सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणा नुकसान झाले होते. यासाठी शासनाने एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे तर कधी निकषा बाहेर जाऊन निधी उपलब्ध केला. मात्र आता अनुदान हे तालुकास्तरावर नव्हे तर शासन स्तरावरून शेतकऱ्यांच्या (Bank) बँक खात्यामध्ये जमा होत आहे. मात्र अमरावती जिल्ह्यातील आतापर्यंत ८४ हजार ९७० शेतकऱ्यांनी केवायसीची प्रक्रिया केलेली नाही.  

बँक खात्याचे केवायसी न केल्याने कोणतेही व्यवहार बँकेत होत नाहीत. परिणामी शासनाकडून येणार मदत निधी देखील अडकलेला आहे. अमरावती जिल्ह्यातील (Farmer) शेतकऱ्यांचा साधारण ६४ कोटी ६१ लाख १५ हजार ८३५  रुपयाचा निधी शासनाकडे पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत तो निधी मिळाला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neechbhang Rajyog 2025: आज शुक्र बनवणार शुक्रादित्य नीचभंग राजयोग; 'या' 3 राशींच्या घरी बरसणार पैसा

Maharashtra Live News Update : सांगली-मिरजला पावसाने झोडपले,

Lucky zodiac signs: गुरुवारी रेवती नक्षत्राचा प्रभाव; जाणून घ्या शुभ मूहूर्त, कोणत्या राशींवर बृहस्पतीची कृपा

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

SCROLL FOR NEXT