Amravati News Saam tv
ऍग्रो वन

Amravati News : अमरावती जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे ६५ टक्के पेरण्या रखडल्या; शेतकऱ्यांच्या आकाशाकडे नजरा

Amravati News : अमरावती जिल्ह्यात सुरवातीला झालेल्या पावसात काही शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. यात साधारण जिल्ह्यात ३५ टक्के पेरण्या झाल्या

Rajesh Sonwane

अमर घटारे
अमरावती
: जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात यंदा मान्सूनचे आगमन झाले आहे. मात्र अमरावती जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून पावसाने दांडी मारल्यामुळे जिल्ह्यातील पेरण्या रखडल्या आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. 

अमरावती (Amravati) जिल्ह्यात सुरवातीला झालेल्या पावसात काही शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. यात साधारण जिल्ह्यात ३५ टक्के पेरण्या झाल्या असून ६५ टक्के पेरण्या अजूनही बाकी आहेत. त्यामुळे बळीराजाला अजूनही पावसाची आस लागली आहे. तर पेरणी केलेल्या पिकांना पावसाची आवश्यकता आहे. त्यामुळे दमदार पाऊस केव्हा येईल; याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

५ शेतकऱ्यांनी संपविले जीवन 

दुसरीकडे मागील दोन दिवसात विदर्भात ५ शेतकऱ्यांनी (Farmer) आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सततची नापिकी, अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान, शासनाची न मिळालेली मदत, बँकांनी रोखलेले कर्ज वाटप या विविध कारणामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

Latur Tourism : पावसाळ्यात हिरवळ, धबधबा आणि शांतता हवीय? मग सहस्त्रकुंड नक्की पाहा

MNS- Shivsena: झाली युती झाली...; राज- उद्धव ठाकरे भेटीनंतर भास्कर जाधवांचं मोठं विधान, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT