मनोज जयस्वाल/ अजय सोनवणे
वाशीम/ मनमाड : सोयाबीनच्या हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. या खरेदीला मुदत वाढ देण्यात आली असून यात आता केवळ तीन दिवस बाकी राहिले आहेत. मात्र वाशीम जिल्ह्यातील तब्बल २२ हजार ६३८ शेतकऱ्यांकडील सोयाबीन खरेदी बाकी आहे. तर नाशिकच्या येवल्यातील सोयाबीन मनमाड वखार मंडळ येथे खरेदीस नकार दिला जात आहे.
बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा शासकीय खरेदी केंद्रांवर कल वाढला आहे. सोयाबीनला हमीभावाने खरेदी करण्यासाठी शासनाने खरेदी केंद्र सुरु केले. यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, संथ खरेदीमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. यानंतर मुदतवाढ देण्यात आल्यानंतर देखील तीच परिस्थिती असल्याने अद्याप बहुतांश शेतकऱ्यांकडील खरेदी बाकी आहे.
केवळ १० हजार शेतकऱ्यांकडील सोयाबीन खरेदी
वाशिम जिल्ह्यात हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी सरकारने ६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र, आतापर्यंत नोंदणीकृत ३२ हजार ८४९ शेतकऱ्यांपैकी केवळ १० हजार २११ शेतकऱ्यांचीच सोयाबीन मोजणी पूर्ण झाली आहे. खरेदी प्रक्रियेतील विलंबामुळे अजूनही २२ हजार ६३८ शेतकऱ्यांची सोयाबीन मोजणी प्रलंबित आहे. मुदत संपायला अवघे तीन दिवस शिल्लक असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
येवल्यातील सोयाबीन मनमाडचे वखार मंडळ करताय रिजेक्ट
मनमाड (नाशिक) : नाशिकच्या येवला खरेदी विक्री संघामध्ये शासकीय आधारभूत किमतीनुसार एनसीसीएफ मार्फत सोयाबीन खरेदी करण्यात आली असून ती सोयाबीन मनमाड येथील वखार मंडळच्या गोडाऊन येथे पाठवण्यात येते. मात्र वखार मंडळातील अधिकारी व एनसीसीएफ काहीही कारण देत सोयाबीन रिजेक्ट करत असल्याने परत ती सोयाबीन येवला खरेदी विक्री संघात पाठवण्यात येत आहे. शेतकऱ्यांना ती परत केली जात असल्याने यामुळे शेतकऱ्यांचा नाहक मनस्ताप होत असून मोठे नुकसान देखील होत असल्याने संबंधित एनसीसीएफ व वखार मंडळाकडे शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी आता करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.