सोयाबीनच्या उत्पन्नात घट; बळीराजाचा खर्चही निघणे कठीण

सोयाबीनच्या उत्पन्नात घट; बळीराजाचा खर्चही निघणे कठीण
Soybean Crop
Soybean CropSaam tv

चेतन व्यास

वर्धा : यावर्षी अतिवृष्टी, सततच्या पावसाने पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. अनेकांची शेती पडीक राहिली. तर ज्‍यांची पिकांची लागवड होती; त्‍यांचे देखील नुकसान झाले आहे. त्यात सोयाबीनचे (Soybean) उत्पन्न घटले असून यंदा खर्चही भरून निघण्याची शक्यता राहिलेली नाही. (Letest Marathi News)

Soybean Crop
Crop Insurance: विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची थट्टा; प्रति गुंठा ५ रुपये नुकसान भरपाई

वर्धा (Wardha) जिल्ह्यात कपाशीसोबतच सोयाबीन मुख्य पीक आहे. जवळपास एक लाख तीस हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड झाली. (Heavy Rain) अतिवृष्टी, सततच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांना दुबार पेरणी करावी लागली. साचलेल पाणी, वाढलेलं तन यामुळे नुकसानीत भर पडली. मध्यंतरी परतीच्या (Rain) पावसानही नुकसान झाले.

एकरी दोन क्विंटलपर्यंत उत्‍पन्‍न

सोयाबीन काढणी सुरू असताना एकरी दोन ते चार क्विंटलपर्यंतच उत्पन्न मिळत आहे. यामुळ शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे खर्च निघणंही कठीण आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना यंदा नुकसान सहन करावं लागत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com