Crop Insurance: विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची थट्टा; प्रति गुंठा ५ रुपये नुकसान भरपाई

विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची थट्टा; प्रति गुंठा ५ रुपये नुकसान भरपाई
Crop Insurance
Crop InsuranceSaam tv

सचिन बनसोडे

शिर्डी (अहमदनगर) : एकीकडे अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असतानाच दुसरीकडे पीक विमा कंपन्यांनी (Farmer) शेतकऱ्यांची अक्षरशः थट्टा केली आहे. प्रधानमंत्री पीकविमा (Crop Insurance) योजनेंतर्गत राहाता तालुक्यातील केलवड येथील बाबूराव गमे या शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून एका गुंठ्यामागे चक्क ५ रुपयेप्रमाणे खात्यात रक्कम जमा झाली आहे. यामुळे पीक विमा कंपन्याविरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. (Live Marathi News)

Crop Insurance
मुंबईहून चिमुकलीचे अपहरण; विक्रीसाठी नेत असताना महिला सोलापूर रेल्वे पोलिसांच्‍या ताब्यात

शेतकरी बाबूराव गमे यांनी त्यांच्या सहा एकराहून अधिक क्षेत्रात सोयाबीन (Soybean) पीक घेतले होते. त्यांनी सगळ्या क्षेत्राचा जवळपास तीन हजार रुपये विमा उतरवला होता. अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) केलवड गावातील बहुतांश शेतकऱ्यांच्या पिकांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. मात्र ज्यावेळी नुकसान भरपाई देण्याची वेळ आली; त्यावेळी विमा कंपन्यांनी बाबुराव गमे यांच्या खात्यावर १ हजार ४०६ रुपये म्हणजे गुंठ्यामागे ५ रुपये प्रमाणे नगण्य रक्कम जमा केली.

नुकसान होऊनही विम्यापासून वंचित

इतर शेतकऱ्यांची असून काहींच्या खात्यात ५, ३८, ४३, ५६, ७०, ९०, १०० ते १३० अशी रक्कम जमा झाली आहे. अनेकांचे नुकसान होऊनही ते विम्यापासून वंचित आहेत. विमा कंपन्यांच्या या धोरणामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आता न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. साम टिव्हीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची व्यथा जाणून घेतली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com