सांगली : यंदा अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागेला फटका बसला आहे. परिणामी घड जिरणे गळकुजमुळे द्राक्ष उत्पादन घटले आहे. अर्थात यात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. तर दुसरीकडे बेदाणा तयार करण्यासाठी द्राक्ष उशिरा येणार आहेत. परिणामी यंदाच्या हंगामातील बेदाणा निर्मिती तब्बल महिनाभर लांबणीवर पडण्याची शक्यता बेदाणा शेड मालकाने व्यक्त केले आहे.
सांगली जिल्ह्यातील आगळगाव नागज परिसर तसेच सोलापूर, जुनोनी परिसरात बेदाणे निर्मिती केली जाते. या दोन्ही भागात ७ हजाराहून अधिक बेदाणा निर्मिती शेड आहेत. या भागात कोरडे वातावरण असल्याने दर्जेदार बेदाणा तयार होतो. बेदाणा निर्मितीचा हंगाम जानेवारी मध्यापासून सुरू होतो. त्यामुळे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून शेड दुरुस्तीचे कामे सुरू होतात. त्यासाठी परराज्यातून मजुरी त्याच दरम्यान शेडवर दाखल होतात.
फेब्रुवारीच्या मध्यापासून बेदाणा निर्मितीला गती येते. मात्र यंदा एप्रिल, मे पासूनच पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर मौसमी पाऊस वेळेत दाखल झाला. परिणामी फळ छाटणीला या पावसामुळे काही अंशी अडथळा निर्माण झाला. त्यातूनही शेतकऱ्यांनी छाटणी केली. परंतु परतीचा पाऊस हा छाटणी केलेल्या द्राक्ष पिकाला मारक ठरला. त्यामुळे घड जिरणे गळ कुज अशा समस्या उद्भवल्या. परिणामी घडांची संख्या कमी झाल्याने द्राक्षाच्या उत्पादनात घट झाली आहे.
महिनाभराचा विलंब
यंदा अधिक पावसाळा झाल्याने पावसाळ्यात फळ छाटणीला झालेल्या विलंबामुळे बेदाणा निर्मितीसाठीची प्रक्रिया देखील लांबणीवर पडली आहे. या सर्व प्रक्रियेमुळे साधारण महिनाभराचा विलंब या संपूर्ण प्रक्रियेला होणार आहे. यातही आता सातत्याने वातावरणात बदल होत असल्याने त्याचा परिणाम देखील बेदाणा निर्मितीवर होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.