परभणी : राज्यातील बहुतांश भागात जूनच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून दाखल झाला. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी देखील आहे. दरम्यान पाऊस येईल या आशेवर परभणी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली होती. मात्र अद्याप पाऊस न आल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
यंदाच्या खरीप हंगामात मृग नक्षत्रावर पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या करण्यास सुरवात केली. अश्यातच जिल्ह्यात काही भागात शेतकऱ्यानी धूळ पेरणीचा जुगार खेळला आहे. तर बऱ्याच भागात शेतकरी पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापसाची अल्पशा पावसावर धूळ पेरणी केली. तर धूळ पेरणी करणाऱ्या शेतकऱयांची पिके उगवू लागली आहेत.
तर करावी लागणार दुबार पेरणी
परभणी जिल्ह्यात जून महिना कोरडाच जात आहे. बळीराजाला पावसाची प्रतीक्षा असून पाऊस पडला नाही; तर दुबार पेरणीचे संकट आहे. जिल्ह्यात ३३ टक्के पेरणी झाली आहे. पुरेसा पाऊस नसल्याने जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.