Parbhani News : अतिवृष्टीत सात एकर कापूस उद्ध्वस्त; पाहून शेतकऱ्याला बसला धक्का, कुटुंबावर शोककळा

Parbhani News : परभणी जिल्ह्यात सर्वत्र रविवारी आणि सोमवारी असे दोन दिवस आभाळ फाटल्यासारखा पाऊस झाला. परिणामी शेतकऱ्यांची सर्वच पिके यात सोयाबीन, कापूस सारखी पिके पूर्णपणे पाण्यात गेली आहेत
Parbhani News
Parbhani NewsSaam tv
Published On

परभणी : राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून परभणी जिल्ह्यात देखील अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये शेतांमध्ये पाणी साचल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत. अशाच प्रकारे अतिवृष्टीमुळे सात एकर क्षेत्रात लागवड केलेला कापूस उध्वस्त झाल्याचे पाहून शेतकऱ्याला हृदयविकाराचा झटका आला. यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

परभणी (Parbhani) जिल्ह्यात सर्वत्र रविवारी आणि सोमवारी असे दोन दिवस आभाळ फाटल्यासारखा पाऊस झाला. परिणामी शेतकऱ्यांची सर्वच पिके यात सोयाबीन, कापूस सारखी पिके पूर्णपणे पाण्यात गेली आहेत. सेलू तालुक्यात देखील प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील हिस्सी येथील विजय कसाब या शेतमजूर शेतकऱ्याचे (Farmer) अतिवृष्टीच्या पावसामुळे सात एकरवरील कापसाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. जमिनीतून अंकुर निघाल्यापासून त्यांची निगा राखत पिकांना वाढविले होते. मात्र पावसामुळे होत्याचे नव्हते झाले. हे पाहून शेतकऱ्याला धक्काच बसला. 

Parbhani News
Gadchiroli News : आयुष्याचा खेळ... तापानं २ लेकरं गेली, मृतदेह खांद्यावर घेत आई-वडिलांची १५ किलोमीटर पायपीट, सरकार लक्ष देणार का?

जोरदार पाऊस झाल्यानंतर पीक पाहणी करण्यासाठी विजय कसाब हे शेतात गेले होते. मात्र कापूस पिकाचे पूर्णपणे नुकसान झाल्याचे त्यांनी पाहिले. पिकांची पाहणी करून ते घरी परतले आणि त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा जीव गेला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली, एक मुलगा व भाऊ असा परिवार आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com