अजय सोनवणे
मनमाड (नाशिक) : बाजार फी कमी करावी; यासाठी व्यापाऱ्यांनी मनमाड बाजार समितीत बंद पुकारला होता. यामुळे मागील दोन दिवसांपासून बाजार समितीतील व्यवहार बंद होते. मात्र व्यापाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत बंद अखेर मागे घेतल्याने आजपासून बाजार समितीचे व्यवहार पुन्हा सुरळीतपणे सुरू झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून सकाळपासूनच शेतकरी माल विक्रीसाठी गर्दी करत आहेत.
नाशिकच्या मनमाड बाजार समितीची फी एक रुपयांवरुन ७५ पैसे करावी; या मागणीसाठी दोन दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता. तेव्हापासून मनमाड बाजार समिती बंद असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. व्यापाऱ्यांनी बाजार फी ७५ पेसे देण्याबाबत पत्र दिल्यानंतर तात्काळ बाजार फी ९० पेसे करण्यात आली. मात्र फी कमी करण्याचा निर्णय पुढील काळात घेण्याचे आश्वासन देवूनही व्यापाऱ्यांनी बंद पुकारण्यात आला होता.
तोडगा निघाल्याने बंद मागे
बाजार समितीची आकारली जाणारी १ रुपया फी कमी करून ती ७५ पैसे करावी; अशी मागणी व्यपारी वर्गाने केली होती. मात्र बाजार समिती प्रशासनाने ती ९५ पैसे केल्याने व्यापाऱ्यांनी त्याला विरोध करत बेमुदत बंद पूकारला होता. अखेर काल बाजार समिती संचालक-व्यापारी यांची बैठक होऊन मध्य मार्ग काढत बाजार फी ८५ पैसे करण्याच्या निर्णयाला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत बंद मागे घेतला आहे. यामुळे आजपासून बाजार समिती सुरु झाली आहे.
शेतकऱ्यांची बाजार समितीत गर्दी
बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्याने या ठिकाणी दोन दिवसांपासून कोणत्याही प्रकारची खरेदी- विक्री होऊ शकली नाही. परिणामी बाजार समितीतील कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले होते. मात्र तोडगा निघाल्याने बाजार समिती सुरु झाली असून आज सकाळपासून खरेदीस सुरवात झाली. यामुळे सकाळपासूनच शेतकऱ्यांची बाजार समितीत गर्दी झाली. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कांदा, मका विक्रीला आणला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.